फक्त दोघांनाच ई-भूमीपुजन हवे आहे, शिवसेना आणि `एमआयएम`

फक्त दोनच राजकीय पक्षांना ई-भूमीपुजन व्हावे असे वाटते. एक शिवसेना अन् दुसरा `एमआयएम` असा टोमणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मारला आहे.
फक्त दोघांनाच ई-भूमीपुजन हवे आहे, शिवसेना आणि `एमआयएम`


नाशिक : अयोध्येच्या भूमीपूजनाचे निमंत्रण कोणालाच नाही. मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण आहे की, नाही हे मला माहिती नाही. मात्र पंतप्रधानांच्या उपस्थितीत ते होत आहे, यातच आनंद आहे. मात्र फक्त दोनच राजकीय पक्षांना ई-भूमीपुजन व्हावे असे वाटते. एक शिवसेना अन् दुसरा `एमआयएम` असा टोमणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मारला आहे. 

भाजपचे नेते फडणवीस शीरपूर (धुळे) येथील कार्यक्रमानंतर मुंबईला जातांना काही काळ येथील हॅाटेलात थांबले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, मी स्वतः अयोध्येतील सर्व कारसेवांना उपस्थित होतो, त्यामुळे जाता आलं असत तर आनंद झाला असता, पण मला निमंत्रण नाही. मात्र आम्ही आंनदी आहोत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करीतत आहेत. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. ते म्हणाले, या कार्यक्रमाचा प्रत्येकाला आनंद आहे. फक्त काही लोकांत याबाबत वेगळे मतप्रवाह असल्याचे चित्र आहे. यामध्ये देशात फक्त दोनच राजकीय पक्ष आहे, त्यांना वाटते, की ई-भूमिपुजन व्हावे असे वाटते. त्यात एक शिवसेना आणि दुसरा एमआयएम आहे. 

यावेळी त्यांनी अभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावर बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आरोप किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास व्यक्त केल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, महाराष्ट्राचे पोलिस कार्यक्षम आहेतच. त्याबाबत अजिबात शंका नाही. मात्र राजकीय दबावामुळे पोलिसांच्या प्रोफेशनलीझममध्ये परिणाम होऊ शकतो. 

ते म्हणाले, मुंबई पोलिसांवर कोणताही आरोप केलेला नाही. याच पोलिसांसोबत मी काम केलं आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस चांगलं काम करत आहेत. मात्र कधी कधी राजकीय दबावामुळे पोलिसांच्या प्रोफेशनलिझममध्ये खंड पडू शकतो. बिहारच्या पोलिस अधिका-यांना कॅारंटाईन का केल? असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, त्यांना जो तपास करायचा तो करू द्यावा आणि परत जाऊ द्यावं. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवेल चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, की बिहार पोलिसांनी करावी. मात्र यासंदर्भात राज्य सरकार जी भूमिका घेत आहे, त्यातून महाराष्ट्र सरकारवर संशय निर्माण होत आहे, तो सरकारने दूर करावा.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=0lJVgWgftFsAX_TSTC4&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=948d4ee4b0d3009e12ed0e7e9d624d95&oe=5F4CAA27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com