अशोक चव्हाणांवर टिका करुन विनायक मेटेंना चर्चेत रहायचे आहे!

स्वार्थ व पद दिसेल तिकडे धावणाऱ्या विनायक मेटे यांना पुढारपणाची संधी शिल्लक नाही. त्यामुळे अस्वस्थ आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टिका करुन चर्चेत येण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो.
अशोक चव्हाणांवर टिका करुन विनायक मेटेंना चर्चेत रहायचे आहे!

 
नाशिक : स्वार्थ व पद दिसेल तिकडे धावणाऱ्या विनायक मेटे यांना पुढारपणाची संधी शिल्लक नाही. त्यामुळे अस्वस्थ आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टिका करुन चर्चेत येण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो. मराठा आरक्षण कॉंग्रेसच्या समितीनेच दिले होते. ते देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात टिकवता आले नाही, याचे भान देखील त्यांना राहिलेले नाही, अशी टिका कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकार गंभीर नाही. समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निष्क्रीय असून समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारवर आमचा विश्‍वास नाही, असा आरोप श्री. मेटे यांनी सोमवारी केला होता. 

यासंदर्भात डॉ. पाटील म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम, कॉंग्रेसच्या राज्यात नारायण राणे समितीने केले होते. या समितीने त्यासाठी परिश्रम घेतले होते. त्यासाठी सबंध राज्य शासन कृतीशील होते. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर हे आरक्षण भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात टिकवता आले नाही. यावेळी श्री. मेटे भाजपबरोबरच होते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. गेली पाच वर्षे श्री. मेटे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांना एक वीट देखील रचता आली नाही. मात्र कोणतेही काम न करता, त्यांनी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे पातक केले. काहीही काम न करता, शिवस्मारकात भ्रष्टाचार झाला. यावेळी फडणवीसांनी किमान त्यावर तोंड उघडावे, असेही त्यांना वाटले नाही. या कालावधीत श्री मेटे यांनी नेमके केले तरी काय?, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. नंतर श्री. चव्हाण व राज्य सरकारवर टिका करावी. 

त्या म्हणाल्या, गेली पाच वर्षे मराठा समाजाने सत्तावन्न मोर्चे काढले. तेव्हा मेटे भाजप व सत्तेबरोबर होते. त्यांनी काय केले?. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना हे शांततापूर्ण मोर्चे निघाले. यावेळी झालेल्या विविध आंदोलनांत सत्तावीस समाज बांधवांनी बलिदान दिले. तेव्हा मेटे सत्तेत राहून काय करीत होते?. आज त्यांना समाजाने झिडकारले आहे. कोणी विचारीत नाही. पुढारपण करण्यास वाव राहिला नाही. त्यामुळे अस्वस्थ होऊन, ते श्री. चव्हाण यांच्यावर टिका करीत सुटले आहेत. श्री. चव्हाण व राज्य सरकार आरक्षणाविषयी अत्यंत गंभीर आहे. त्यांचा, प्रशासनाचा याविषयी अभ्यास झाला आहे. वकिलांची नेमणूक झाली आहे. न्यायालयात व्हर्च्युअल सुनावणी न करता प्रत्यक्ष सुनावणी व्हावी हा यातील प्रमुख गतिरोध आहे. त्यावर ते निश्‍चित मार्ग काढतील. मात्र त्यासाठी मेटे यांनी समाजाची व जनतेची दिशाभूल करु नये. कारण लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास नाही. 
...  
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bc8GGgb4Yi0AX98pX8O&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=b46111edd06db0e5c81541cf03bc9c6a&oe=5F509EA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com