भांडणे लावणा-या गटविकास अधिका-याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

इगतपुरीचे गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करीत नाहीत. गटातटात वाद होतील असे काम करतात. त्यांच्या काळात अनेक ग्रामपंचायतींत गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळेे त्यांची बदली करावी.
भांडणे लावणा-या गटविकास अधिका-याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

इगतपुरी : पंचयात समितीने केलेल्या ठरावांची कार्यवाही होत नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. यासंदर्भात निष्क्रीय गटविकास अधिका-यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी माजी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्याविषयी नागरीकांच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी शिवसेना नेत्या, माजी आमदार गावित आणि पंचायत समिती सभापती जया कचरे यांनी केली आहे. 

गटविकास अधिकारी जाधव यांना इगतपुरी तालुक्यात चार वर्ष पूर्ण झाले आहेत. पंचायत समिती सभापती, उपसभापती यांनी सभागृहामध्ये मांडलेल्या ठरावाची अंमलबजावणी आणि पाठपुरावा होत नाही. याबाबत पदाधिकारी वारंवार त्यांच्याशी संपर्क करतात. मात्र त्याला काहीही प्रतिसाद मिळत नाही. तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. गट विकास अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. यामुळे त्यांच्या विरोधात सभापती ,उपसभापती, कार्यकारी मंडळाने तक्रार केली आहे. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी असे आमदार गावित यांच्या पत्रात म्हटले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून इगतपुरी पंचायत समितीत कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटविकास अधिकारी संचालक मंडळाने केलेल्या ठरावाची कार्यवाही करत नाहीत. पंचायत समितीच्या गटांमध्ये सुचवलेली कामे करण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करतात. यांच्याच कार्यकाळामध्ये शिवसेनेची सत्ता असूनही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना उपोषण  करण्याची वेळ आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार झालेले आहेत. त्याबाबत सदस्यांनी पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. गटविकास अधिकारी हे गटातटाचे राजकारण करून वादविवाद निर्माण करतात. सदस्यांमध्ये भांडणे निर्माण होतात. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली केली नाही, तर त्यांच्यापासून तालुक्यातील कार्यकर्त्यांची कामे  होणार नाहीत. गावागावांमध्ये मंजुर झालेली कामे रखडतील, अशी भिती आहे. त्यासाठी तातडीने बदली व्हावी.  या मागणीसाठी पंचायत समिती सभापती जया कचरे, उपसभापती जिजाबाई नाठे, गटनेता विठ्ठल लंगडे, भगवान आडोळे, आण्णा पवार, सोमनाथ जोशी, विमल तोकडे, विमल गाढवे, कल्पना हिंदोळे, कौसाबाई करवंदे या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=m6EI_UoaddIAX8yINNZ&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=6c3cf95fbc128a3aab1be06c24554872&oe=5F3CD827

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com