नाशिकच्या उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक संशयास्पद?

मायको व त्रिमूर्ती चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेताना थेट विधी मंडळाच्या अंदाज समितीकडे धाव घेत पुलाच्या अंदाजपत्रकावर संशय घेतला आहे. विधी मंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार
Thakre- Shaikh
Thakre- Shaikh

नाशिक : मायको (Mico) व त्रिमूर्ती चौकातील (Trimurti chowk) प्रस्तावित उड्डाणपुलाच्या (Praposed flyover) वादात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP taken jump in the issue) उडी घेताना थेट विधी मंडळाच्या अंदाज समितीकडे धाव घेत पुलाच्या अंदाजपत्रकावर संशय घेतला आहे. विधी मंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्याकडे लेखी तक्रार करीत पुलासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakre) यांनी केली आहे.

राष्ट्रवादी पाठोपाठ मनसनेही या वादात उडी घेतली आहे. त्यांनीही याबाबत माहिती मागवल्याने आगामी निवडणुकीत उड्डाणपूल वादाचे केंद्रस्थान राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरात मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल तयार होत आहे. अडीचशे कोटी रुपये किमतीच्या पुलांच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सुरवातीला सत्ताधारी भाजप व शिवसेनेत कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी विकासकामांसाठी निधी आवश्‍यक असल्याने पुलाचे काम थांबवून तो निधी नगरसेवकांच्या विकासकामांकडे वळविण्याची मागणी केल्यानंतर वाद विकोपाला गेला. त्यानंतर पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटची प्रत वाढविण्याचे कारण देत पुलाचे काम घेतलेल्या संस्थेकडून तब्बल ४४ कोटी रुपये अतिरिक्त मागणी करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर पुलासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेचा मुद्दा समोर आला.

बीओटी प्रकल्पांच्या सल्लागार संस्था नियुक्तीवरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडल्यानंतर आयुक्तांनी बीओटीसाठी नवीन सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रीया राबविली, तर शिवसेनेने त्यापूर्वी शासनाकडे धाव घेतली. भाजपने हाच धागा पकडून पुलांच्या सल्लागार संस्थेच्या नियुक्तीवरून शिवसेना शासनाकडे धाव घेणार, का असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेताना दोन्ही उड्डाणपुलाकरिता नियुक्त केलेल्या सल्लागारास पूल उभारण्याचा कुठलाही अनुभव नसताना त्यांच्याकडून रचना व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे पुलाचे काम तातडीने थांबविण्याची मागणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता विधी मंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य सतीश चव्हाण यांच्यामार्फत पुलाच्या चौकशीची मागणी केली.

मनसेने मागविली माहिती
मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनीदेखील उड्डाणपुलांबाबत आयुक्त कार्यालयाकडून माहिती मागविली आहे. उड्डाणपुलाचा प्रस्ताव कोणी तयार केला, महासभा व स्थायी समितीने मान्यता दिलेल्या ठरावाची प्रत, पुलाच्या कामाचे प्राकलन, सल्लागार संस्थेची नियुक्ती कशी झाली, सर्व्हेक्षण कसे केले, मुळ प्राकलनात कोणाच्या मान्यतेने बदल केले, कामाची सद्यःस्थिती, अतिरिक्त ४४ कोटी रुपयांची मागणी कुठल्या आधारे करण्यात आली, आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

...
उड्डाणपुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून, महापालिकेने दखल न घेतल्यास पर्याय म्हणून अंदाज समितीकडे तक्रार करण्यात आली आहे.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
...
विकासकामांना मनसेचा विरोध नाही, मात्र पुलाच्या नावाखाली लूट होऊ देणार नाही. अनुभव नसलेल्या सल्लागाराकडून पूल तयार झाल्यास भविष्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण राहणार याचे उत्तर मिळावे.
- सलीम शेख, नगरसेवक, मनसे. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com