नाशिक, बीड, उस्मानाबाद बॅंकेला निधी दिला...पण संचालकांचे हात बांधले !

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला राज्य शासनाने कर्जमाफीचे 870 कोटी रुपये गुरुवारी वर्ग केले. मात्र या निधीचा विनियोग कसा करावा याचे निकष व अटी निश्चित केल्या आहेत.
नाशिक, बीड, उस्मानाबाद बॅंकेला निधी दिला...पण संचालकांचे हात बांधले !

नाशिक : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला राज्य शासनाने कर्जमाफीचे 870 कोटी रुपये गुरुवारी वर्ग केले. मात्र या निधीचा विनियोग कसा करावा याचे निकष व अटी निश्चित केल्या आहेत. राज्यातील नाशिक, बीड, उस्मानाबाद या जिल्हा बॅंकांना काल सहकार विभागाने निधी वर्ग केला. मात्र या पत्रातच संचालकांचे हात बांधले आहेत. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा निधी ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे वितरीत करता आला नव्हता. त्यामुळे खरीप हंगाम सुरु झाला, मात्र या बॅंकांकडे रोखता व रोकड दोन्ही नसल्याने पीककर्ज वीतरण बंद झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. राज्य शासनाने कृषी कर्ज वितरणासाठी वारंवार सुचना दिल्या होत्या. मात्र त्याची अपेक्षीत अंमलबजावणी झालेली नव्हती. नाशिक जिल्हा बॅंकेला भाजप- शिवसेना सरकारच्या कार्यकाळात घोषीत केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचेही पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता 870 कोटींची निधी वितरीत केला आहे. 

सहकार विभागाने निधी वर्ग केला. मात्र त्याचे वितरण कसे करावे, याचे निकष निश्चित केले आहे. या निधीचा उपयोग बॅंकेच्या संचालकांना आपल्या मर्जीतील संस्था, व्यक्तींच्या ठेवी परत करण्यासाठी करता येणार नाही. हा निधी केवळ पीककर्ज वितरणासाठीच करता येणार आहे. त्याबाबत प्राधान्यक्रम निश्चित केल्यावर त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एका बाजुने निधी वर्ग होताच, संतालकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यावर आता पाणी फिरले आहे. सहकार विभागाच्या आदेशाद्वारे एक प्रकारे राज्य सरकारने बॅंक संचालकांचे हात बांधले आहेत. 

राज्यातील नाशिक, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्हा बॅंकांना गुरुवारी निधी वर्ग केला. यातील नाशिक व उस्मानाबाद बॅंक तोट्यात आहे. बीड जिल्हा बॅंक नफ्यात आहे. मात्र तिन्ही बॅंका प्रशासकीय स्तरावरील अनियमिततांमुळे चर्चेत आहे. त्यांच्याविषयी सहकार व नाबार्ड बॅंकेकडे विविध तक्रारी आहेत. त्यामुळे निधी वर्ग करतांना राज्य शासनाने या बॅकांच्या संचालकांचे हात बांधले आहेत. त्यात नाशिक जिल्हा बॅंकेच्या संतचालक मंडळाची मुदत संपली आहे. या बॅंकेचे संतालक मंडळ कलम 88 अन्वये कारवाईने बरखास्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालायत यासंद्रर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेची सुनावणी प्रलंबीत आहे. त्यावर गेले वर्षभर संगणकीय प्रोग्रामींगनुसार तारखा मिळत आहेत. या तारखांमुळे संचालक मंडळाला जीवदान मिळालेले आहे. त्यामुळे या संचालकांकडून 870 कोटींचा निधी कसा उपयोगात आणला जातो, यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी सहकार विभाग व शेतकरी संघटनांसह जिल्ह्यातील जागृत नेत्यांची आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com