मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या! 

सप्टेबर महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. वारंवार झालेल्या या पावसाने खरीपातील विविध पिके काढणीच्या अवस्थेत असताना त्याचा मोठी झळ बसली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची आवश्‍यकता आहे.
मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या! 

नाशिक : सप्टेबर महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. वारंवार झालेल्या या पावसाने खरीपातील विविध पिके काढणीच्या अवस्थेत असताना त्याचा मोठी झळ बसली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची आवश्‍यकता आहे. मात्र शासनाने अद्याप त्याविषयी काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केली आहे. 

यासंदर्भात खासदार पावर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे. सप्टेबर महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यात येवला, बागलाण, नांदगाव, मालेगाव यांसह विविध तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली. शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतले जाते. खरीप कांदा हा त्यादृष्टीने महत्वाचे पीक असते. मात्र हा कांदा काढणीच्या अवस्थेत असतानाच अतिवृष्टी झाली. त्यात कांदा पक्व स्थितीत असताना सडला. जो कांदा विक्रीसाठी साठविला होता, तो साठवण चाळीतच खराब झाला. त्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. अशीच स्थिती सोयाबीन व न्य भाजीपाल्याच्या पिकांची आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी स्तरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची काहीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी नाऊमेद झाला आहे. त्याला शासनाने दिलासा द्यावा. 

खासदार पवार म्हणाल्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. संसदेचे अधिवेशन आटोपून परतताच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नुकसानीचा डॉ. पवार यांनी आढावा घेतला. पुरामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरे तसेच रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जीवनमान विस्कळित झाले असताना निसर्गाने अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसानभरपाई मिळावी. 
...  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com