मोर्चा गाजवणारी कोमल म्हणते, `ही सरकारची जबाबदारी` 

मराठा क्रांती मोर्चात भाषणाच्या माध्यमातून मैदान गाजविणाऱ्या काजल गजेंद्र गुंजाळ हिने मराठा आरक्षण रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत ठेवून प्रत्येक वेळी निवडणुकीत त्याचा वापर करणे हे आता मराठा समाजाला कळून चुकले आहे.
Kajal
Kajal

नाशिक : मराठा क्रांती मोर्चात भाषणाच्या माध्यमातून मैदान गाजविणाऱ्या काजल गजेंद्र गुंजाळ हिने मराठा आरक्षण रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत ठेवून प्रत्येक वेळी निवडणुकीत त्याचा वापर करणे हे आता मराठा समाजाला कळून चुकले आहे. त्यामुळे आता मराठा समाज कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. 

ती म्हणाली, यापूर्वीच्या भाजप सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकविले, सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने आरक्षण टिकविणे गरजेचे होते. ही त्यांची नैतिक जबाबदारीच होती.

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने काजलने मुंबईत जोरदार भाषण करून मैदान गाजविले होते. तिनेसुद्धा या आरक्षणाबद्दल राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाला वेड्यात काढण्‍याचे काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. कुठे कमी पडलो, काय उणिवा राहिल्या यावर विचार करण्यापेक्षा राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर छातीठोकपणे मागच्या सरकारने जो कायदा पारित केला तो टिकणारच नव्हता, असे आरोप केले जात आहे. परंतु मागील सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकविले हेदेखील तितकेच खरे आहे. सर्वोच्च न्यायालयात मागील युक्तिवादाच्या आधारे बाजू मांडणे अपेक्षित होते; परंतु मागील सरकारवर दोषारोप ठेवले जात आहेत. सरकारकडे दोन वर्षे होती, त्यांनी या काळात मराठा आरक्षणासंदर्भात कुठल्या बैठका घेतल्या, त्यांच्या मोठ्या वकिलांनी कुठला अभ्यास केला, असा सवाल केला. काजलने नवाब मलिक यांनी आता मराठा आरक्षणापासून लांबच राहावे, असा सल्ला दिला आहे. राज्य मागास आयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून मराठा समाज मागास आहे हे स्पष्ट केले असून, ते मांडण्यात राज्य सरकारच्या वकिलांना अपयश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तो अहवाल फेटाळला. राज्यातील विद्यमान सरकारला मागील सरकारने दिलेले आरक्षण श्रेयवादासाठी टिकू नये हेच वाटते हे यावरून स्पष्ट होते.

(स्व.) अण्णासाहेब पाटील आणि असंख्य मराठा हुतात्मे झाले. त्यांचे बलिदान मराठा समाज व्यर्थ जाऊ देणार नाही. हा लढा अंतिम न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार असल्याचे काजलने सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com