जनतेला निकृष्ट धान्याचे वितरण होऊ देऊ नका

राज्यातील जनतेला कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होऊ नये, असा आदेश अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला. तसेच, अन्नधान्य वितरणावर काटेकोर लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांना दीडपट जादा थाळ्या वितरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : राज्यातील जनतेला कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होऊ नये, असा आदेश अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला. तसेच, अन्नधान्य वितरणावर काटेकोर लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांना दीडपट जादा थाळ्या वितरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणासंबंधी विभागाचे अधिकारी व राज्याच्या सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, की पार्सल शिवभोजन थाळीत निकृष्ट स्वरूपाचे अन्न नाही ना, याची खातरजमा करावी. नियम, स्वच्छता, अनियमितता अथवा गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवावे. जनतेला वेळेत आणि नियोजनबद्ध असा अन्नधान्याचा पुरवठा झाला पाहिजे. राज्य सरकार राज्यातील सात कोटी जनतेला धान्य मोफत देणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी योजना चालू होण्याचा अगोदर धान्य घेतले आहे त्यांना पुढील महिन्यात लाभ मिळायला हवा. ज्या ठिकाणावरून तक्रारी येतील त्याची शहानिशा करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर, सहसचिव सुधीर तुंगार, वैधमापन नियंत्रक रवींद्र सिंघल, वित्तीय सल्लागार व उपसचिव अभय धांडे, पुरवठाचे सर्व उपायुक्त- जिल्हा पुरवठा अधिकारी-अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपासून प्रलंबित ध्यान भरडाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचा आढावा श्री. भुजबळ यांनी घेतला. विदर्भातील पाच जिल्ह्यातील मिलिंग पूर्ण क्षमतेने चालू झाली आहे का, याची माहिती श्री. भुजबळ यांनी घेतली. 

केंद्राच्या परवानगीनंतर बंद 
राज्यातील अनेक रेशन दुकानदारांनी ऑनलाइन पद्धतीला विरोध केला. अंगठा दुकानात येऊन प्रत्येक व्यक्ती लावते, त्या मुळे कोरोना संक्रमण होत असल्याची रेशन दुकानदारांची चिंता आहे. मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार ही यंत्रणा चालू राहणार आहे. मागील लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने ही प्रणाली बंद केली होती. पण त्यावर केंद्र सरकारने प्रश्न उपस्थित केले होते. त्या मुळे केंद्राची परवानगी असेल, तरच ही पद्धत बंद करता येईल, असे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यात संकटाच्या काळात कुठेही अन्नधान्यांची आणि वस्तूंची साठेबाजी अथवा चढ्या दराने विक्री होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसे कुठे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश श्री. भुजबळ यांनी दिले. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com