श्रावण आला, आता तरी मंदिरे, देवस्थाने खुली करा!

कोरोना संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रात टाळेबंदी आहे. केंद्र शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, तसेच अटी- शर्तींवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात "पुनश्‍च हरिओम' अभियानांतर्गत राज्यातील मंदिरे व देवस्थाने खुली करण्यात यावीत.
श्रावण आला, आता तरी मंदिरे, देवस्थाने खुली करा!

नाशिक : कोरोना संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रात टाळेबंदी आहे. केंद्र शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, तसेच अटी- शर्तींवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात "पुनश्‍च हरिओम' अभियानांतर्गत राज्यातील मंदिरे व देवस्थाने खुली करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक सेलचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात आचार्य भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात विलेपार्ले येथील संन्यासी संप्रदायातर्फे संन्यास आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी विश्‍वेश्‍वरानंद, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले उपस्थित होते. अनेक राज्यांमध्ये देवस्थाने सुरू करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "पुनश्‍च हरिओम' असे म्हणत सुरू केलेल्या अनलॉकमध्ये सर्व बाजारपेठा, उद्योगधंदे, हॉटेल, मद्यविक्री सुरू झाली आहे. आजपासून हॉटेल व लॉजदेखील सुरू होऊन सर्वांचे "पुनश्‍च हरिओम' झाले आहे. मात्र अखिल विश्‍वाचा प्राणनाथ "हरि' अजूनही टाळेबंदच करून ठेवलेला आहे. याबाबत राज्यपालांनी राज्य शासनाला निर्देश देऊन मंदिरे व देवस्थाने खुली करावीत. 

ते म्हणतात, की भारतीय समाज हा देव-धर्माविषयी अत्यंतिक आस्था व श्रद्धा असलेला समाज आहे. पवित्र श्रावण महिना येत्या 21 जुलैला सुरू होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. या संकटाच्या काळात भाविक जनतेला आपल्या अराध्य देवतांची पूजा व धार्मिक कार्यक्रम करून मानसिक आधार प्राप्त होण्यास मदत होईल. मंदिरासमोर हार, फुले, प्रसाद विक्रीतून उपजीविका करणाऱ्या गरीब लोकांचा चार महिन्यांपासून उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटेल. मात्र अद्यापही महाराष्ट्र सरकारने त्यासाठी कोणतिही प्रक्रिया सुरू केलेली नाही. अटी-शर्तींसह देवालये सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. 
या मागणीविषयी विविध संघटनांचा सहभाग असल्याचा दावा प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे. यामध्ये अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, राष्ट्रीय वारकरी परिषद, संन्यास आश्रम ट्रस्ट, जय बाबाजी भक्त परिवार, वीरशैव लिंगायत संप्रदाय, हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ यांची नावे आहेत. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EbhnMwHhfCsAX8JZgEO&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=17445e9e403014da9cb2844c5b584cab&oe=5F2D0627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com