नाशिक : जिल्ह्यातील मौजे वाठोडा (ता. बागलाण) येथे बर्ड फ्ल्यु रोगामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाने दहा किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र घोषीत केला आहे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यु आढळला आहे. मात्र प्रशासन यासंदर्भात सतर्क आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
यापूर्वीही जिल्ह्यात काही भागात कावळे मृत आढळले होते. त्यांची तपासणी केली असता नुकत्याच आलेल्या अहवालानुसार त्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युने झाल्याचे आढळले होते. काल यासंदर्भात सटाण येथील मोजे वाठोडा येथील गट क्रमांक 62 मध्ये बर्ड फ्ल्युमुळे कोंबड्या मृत पावल्याचे आढळले. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागात होऊ शकतो. तशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधक उपाय योजना म्हणून मौजे वाठोडा शिवारातील बाधित कोंबड्यांचे शाश्त्रोक्त पद्धतीने कलोग करुन विल्हेवाट लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेतर्फे सूरज मांढरे यांनी यासंदर्भात मौजे वाठोडा गट क्र. 62 पासून एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र घोषित केला आहे. दहा किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कूट पक्ष्यांची तसेच निगडीत खाद्य, अंडी यांचीही शाश्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी शिघ्र कृती दलास आदेश देण्यात आले आहेत. पुढील नव्वद दिवस या भागातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी विक्री करण्यास मनाई केली आहे. दक्षता घेतली जात असल्याने नागरिकांनी कालजी करु नये असा आवाहन करण्यात आले आहे.
...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.