नाशिकला वाढत्या मृत्यूंमुळे स्मशानभूमीसाठी जागेचा शोध 

कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरातील सर्वच स्मशानभूमीमध्ये मृतदेह वेटिंगवर आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर पर्याय म्हणून स्मशानभूमीसाठी नवीन जागेचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे.
Amardham
Amardham

नाशिक : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरातील सर्वच स्मशानभूमीमध्ये मृतदेह वेटिंगवर आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर पर्याय म्हणून स्मशानभूमीसाठी नवीन जागेचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे. नाशिक अमरधामच्या वरच्या बाजूला, तसेच सिंहस्थात बांधण्यात आलेल्या घाटांवर अंत्यसंस्कारची परवानगी देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. 

शहरात कोरोना संसर्गवाढीचा वेग अद्यापही कायम असून, रविवारपर्यंत शहरात एक लाख साठ हजारांच्या वर कोविड रुग्णांची नोंद झाली. मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. या दीड महिन्याच्या कालावधीत शहर व जिल्हा मिळून ६७ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असताना मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. १ ते १६ एप्रिल यादरम्यान शहरात सरणावर जाळण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या दोन हजार ३६० नोंदविली गेली. यातील एक हजार ७९३ कोविडमुळे मृत झाले आहेत. पंचवटी व पूर्व विभागातील म्हणजे नाशिक अमर

धाममध्ये सर्वाधिक अंत्यसंस्कार होत आहेत.

शहरात सतरा अमरधाम मिळून अंत्यसंस्कारासाठी ७० बेड उपलब्ध आहेत. त्याशिवाय विद्युत व गॅस दाहिनीवरही दहन केले जात आहे. शहर, ग्रामीण भागासह उत्तर महाराष्ट्रातील अंत्यसंस्कारदेखील नाशिक अमरधाममध्ये होत असल्याने मिळेल त्या जागेवर सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. एका जागेवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन तासांत त्या जागेवर नवीन अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत असल्याने जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्काराचे वेटिंग थांबविण्यासाठी नवीन जागेचा शोध घेतला जात असून, नाशिक अमरधामच्या वरच्या बाजूला असलेल्या जागेत किंवा सिंहस्थात कन्नमवार पुलापर्यंत बांधण्यात आलेल्या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 

गेले काही दिवस कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाभरातील रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत दाखल होत आहेत. शहरातील रुग्णालये फुल्ल असून अनेक रुग्णालयांत अक्षरशः वेटींग लीस्ट आहे. त्यामुळे एव्हढी चिंताजनक परिस्थिती यापूर्वी नव्हती. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार शासनाने निश्चित केलेल्या नियमांत करावे लागतात. त्यामुळे नागिरकांना उपस्थित राहण्यास देखील मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या अन्य भागातील नागिरकाचे निदन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार देखील शहरातच होऊ लागले आहेत. त्यामुळे स्मशानभूमीची जागा अपुरी पडू लागली आहे.  
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com