"गरजे एव्हढाच युरीया वापरा' म्हणत कृषीमंत्र्यांनी सुटका करुन घेतली

सगळीकडे दिवसभर रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना युरीया मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर सटाण्यात दौऱ्यावर आलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनीविचारले. त्यावर "तुम्ही जेव्हढा गरजेचा आहे, तेव्हढाच युरीया वापरा' असे सांगत शेतकऱ्यांच्या गर्दीतून सुटका करुन घेतली.
"गरजे एव्हढाच युरीया वापरा' म्हणत कृषीमंत्र्यांनी सुटका करुन घेतली

नाशिक : नाशिक हा कृषीमंत्री दादा भुसे यांचा जिल्हा. मालेगाव हा त्यांचा मतदारसंघ, तर बागलाण हा त्यांच्या लगतचा परिसर. इथे सगळीकडे दिवसभर रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना युरीया मिळत नाही. सगळ्यांची ओरड आहे. या पार्श्‍वभूमीवर सटाण्यात दौऱ्यावर आलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारले. त्यावर त्यांनी "तुम्ही जेव्हढा गरजेचा आहे, तेव्हढाच युरीया वापरा' असे सांगत शेतकऱ्यांच्या गर्दीतून सुटका करुन घेतली.

राज्यात विविध जिल्ह्यांत युरीयाची टंचाई आहे. त्याविषयी मोठ्या प्रमाणात ओरड आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मालेगाव, सटाणा येथे शेतकरी युरीयासाठी दिवसभर रांगेत उभे असतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा युरीचा पुरवठा करण्यात आला आहे. तरीही नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात याविषयी मोठ्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे बागलाण तालुक्‍यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झालेल्या भागाच्या पाहणीसाठी आले होते. त्यांनी ठिकठिकाणी बांधावर जाऊन पीकपाहणी केली. शेतकऱ्यांशीही चर्चा केली. यावेळी काही ठिकाणी युरीयाच्या टंचाईचा प्रश्‍न शेतकऱ्यांनी विचारला.

यावेळी श्री भुसे म्हणाले, "तुम्हाला जेव्हढा गरजेचा आहे, तेव्हढाच युरीया वापरा. जास्तीचा युरीया वापरु नका. जास्त युरीया वापरला म्हणजे, जास्त पीक येणार नाही. टंचाईचा प्रश्‍न देखील मी सोडवेल. येत्या आठ दिवसांत सगळ्यांना युरीया मिळेल'. असे सांगत त्यांनी आपली सुटका करुन घेतली. 

सकाळी साडेनऊच्या त्यांनी अंबासन येथे भेट दिली. यावेळी डाळींबाला पर्याय म्हणून सिताफळाची लागवड केलेल्या शेतीला भेट दिली. त्यानंतर पंचवीस शेतक-यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शेतीगटाला भेट दिली. शेती गटातील शेतक-यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मक्‍याच्या शेतात जाऊन पाहणी केली. परिसरात कुठे लष्करी अळीचा प्रादूर्भाव आहे का? असाही प्रश्न मंत्री भुसे यांनी उपस्थित केला. याचवेळी काकडगाव शिवारात लष्करी अळीने नुकसान झालेल्या मक्‍याच्या पिकाची पाहणी केली. उपस्थित कृषी आधिकाऱ्यांना लष्करी अळीवर तातडीने काय केले पाहिजे?. त्यात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले. 

काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांनी अहिरानी भाषेतूनही माहिती दिली. अंबासन येथे ते म्हणाले, "पिकं वाढावाना शेत त्यामुळे खत घाला, पण त्यातून त्याले उत्पन्न येई राहिनं का, हाई पाहणं महत्वनं शे' अशा आहिराणी शैलीत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप बोरसे, कृषी अधिक्षक पडवळ, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, प्रणय हिरे, पंचायत समितीचे उपसभापती कान्हु आहिरे, लालचंद सोनवणे, डॉ. प्रसाद सोनवणे, सुभाष नंदन, चंद्रकांत कोर, जितेंद्र सुर्यवंशी, तारीफ शेख, जिभाऊ कोर, निलेश सावंत, भूषण कोर आदि शेतकरी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=zOkpGagCTKIAX87QsWa&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=0ebe751f396f712fc9a8a97964a8574d&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com