गुलाबराव पाटील म्हणतात... तर देवेंद्र फडणवीस यांचीही वाहवा झाली असती

आज जनतेचा जीव वाचविण्याची गरज आहे, अशा वेळी रेमडेसिव्हिरसाठी राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पोलिस स्टेशनला जाणे ही शरमेची बाब आहे.
 Gulabrao Patil, Devendra Fadnavis .jpg
Gulabrao Patil, Devendra Fadnavis .jpg

जळगाव : आज जनतेचा जीव वाचविण्याची गरज आहे, अशा वेळी रेमडेसिव्हिरसाठी राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पोलिस स्टेशनला जाणे ही शरमेची बाब आहे, अशी टीका शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 
 
रेमडेसिव्हिरचा वाद करून केवळ फक्त तेवढ्या कामाकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पोलिस स्टेशनला गेले होते. मात्र त्यांनी तेथे न जाता रेमडेसिव्हिर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न केले असते, तर त्यांचीही वाहवा झाली असती. 

तन्मयने घेतली लस...काका देवेंद्र फडणवीस ट्रोल..इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का?

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रातही त्यांचे सरकार आहे. रेमडेसिव्हीर हा राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यात राजकारण न करता ज्याप्रमाणे त्यांनी लॉक डाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, त्याच प्रमाणे रेमडेसिव्हीर देण्यासाठी ही फडणवीस यांनी मादत करायला पाहिजे होती. ही अपेक्षा जनतेची आहे. टीव्हीवर बघून आता आम्हालाही कंटाळा वाटायला लागला आहे. काय चालले आहे. जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी रेमडेसिव्हीर वरून पोलिस स्टेशनला जावे ही अत्यंत शरमेची बाब आहे, असल्याचे पाटील म्हणाले.

प्रकरण काय? 

रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून (ता. १७ एप्रिल) दिवसभर सुरू असलेला राजकीय वाद रात्री उशिरा पोलिस ठाण्यात पोचला. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बीकेसी येथे पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात त्यांना नेण्यात आले होते.  त्यांना पोलिस स्टेशनाल नेल्या नंतर त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना विचारणा केल्याने तणाव निर्माण झाला होता. या नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बीकेसीकडे धाव घ्यावी लागली होती. 

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आल्याने या कंपनीकडे सुमारे ६० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा आहे. हा साठा महाराष्ट्रात विकण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीला तातडीने परवानगी दिली आहे. तरीही औषधे मिळत नसल्याने यावरून वाद पेटला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com