भाजप आमदाराने अधिकाऱ्याला डांबून कार्यालयास ठोकले कुलूप 

जळगाव वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
 BJP is aggressive on the issue of electricity bill .jpg
BJP is aggressive on the issue of electricity bill .jpg

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तब्बल सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी व भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यास खुर्चीला बांधून कार्यालयास कुलूप लावले.

जळगाव वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीने अधिकारी शेख याना खुर्चीला बांधून व त्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले. याबाबत माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्यातील तब्बल सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केले आहे.

शेतकरी बिल भरण्यास तयार असतानाही अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यास खुर्चीला बांधले. मात्र, जर शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मंत्र्यांनाही खुर्चीला बांधण्यांचा इशारा त्यांनी दिला. या नंतर आमदार चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा...

गृहखात्यापेक्षा महावितरणची वसुली जोरात; बिलांची होळी अन् सरकारच्या नावाने बोंब मारणार

निलंगा : राज्य सरकार हे महावसूली सरकार असून नागरिकांकडून वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. या वसुलीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने होळीच्या दिवशी वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या होळीचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी वीज बीला संदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निलंगेकर म्हणाले,  कोविड-१९ काळात अनेक महिने दुकाने व व्यवसाय बंद होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद पडली. मात्र या काळातही महावितरणने वीजबिले दिली. भरमसाठ बिलांमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्यांना बिल भरणे शक्य नाही.

साध्या केस कर्तनालयासारख्या दुकानदारांना लाखोंची बिले आली आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी देण्यापूर्वीच वीज बिले पाठविली आहेत. यामुळे सामान्य नागरिक संकटात असल्याने या सरकारच्या विरोधात २८ तारखेला होळी पौर्णिमेच्या दिवशी आंदोलन केले जाणार आहे. सरकारच्या नावाने बोंबा मारून वीज बीलांची देखील होळी केली जाणार आहे. 

राज्यभरातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करत घरातच हे आंदोलन करावे असे आवाहनही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव विज बीलाची होळी करून त्याचे फोटो निषेध म्हणून सोशल मिडीयावर व्हायरल करावे, तसेच  सरकारलाही पाठवावे असेही निलंगेकर म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com