आरोप करून बदनामीचा भाजपचा ट्रेंड मोडून काढू

सध्या भारतीय जनता पक्षाकडून वैयक्तीक आरोप करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बदनाम करणे व त्यांना वैयक्तीक आयुष्यातून उठवणे हा नवा राजकीय ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्यावरील आरोप झाकण्यासाठी कोणालाही बदनाम करणेआणि तो आरोप सिध्द व्हायच्या आत दुसरं खोट प्रकरण शोधुन काढनं हे भाजपकडून केले जाते.
Anil Deshmukh- Paramveer
Anil Deshmukh- Paramveer

नाशिक : सध्या भारतीय जनता पक्षाकडून वैयक्तीक आरोप करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बदनाम करणे व त्यांना वैयक्तीक आयुष्यातून उठवणे हा नवा राजकीय ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्यावरील आरोप झाकण्यासाठी कोणालाही बदनाम करणे आणि तो आरोप सिध्द व्हायच्या आत दुसरं खोट प्रकरण शोधुन काढनं हे भाजपकडून केले जाते. मात्र आम्ही हा ट्रेंड मोडून काढू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला आहे. 

यासंदर्भात ते म्हणाले, सध्याच्या ताज्या प्रकरणात भाजप पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांचा वापर करीत आहे. मात्र आता असले ट्रेंड चालत नाहीत हेच आम्हाला स्पष्ट करायचे आहे. पोलीसांसोबत रस्त्यावर उतरून काम करणा-या गृहमंत्र्यांनी दोन दिवसांपुर्वी सांगीतलं की, परमबीर सिंग यांच्याबद्दल माफ न करता येणारे पुरावे सापडले आहेत’ त्यानंतर लगेच या प्रकरणात कोणीतरी त्यांना वाचविण्याचा शब्द देतो काय आणि पोलिस दलात असुनही सही न करता निनावी मेल पाठवून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याची मोहीम सुरु होते. हे न समजण्याएव्हढे नागरिक खुळे नाहीत. 

ते म्हणाले, विरोधकांना कोरोनासारख्या महाभयंकर काळात महाविकास आघाडी सरकारने चांगल्या प्रकारे कारभार केलेला असताना असे राजकारण करण्याची गरज वाटते. हे वाईट आहे. संयम सोडलेल्या भाजपने कायम भावनीकतेचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढले आहे. जनतेला काहीच समज नाही असे गृहीत धरून विषयांतर करत तिन्ही अधिवेशनांत एकही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे विषय त्यांनी मांडले नाही. पहिलं अधिवेशन सुशांत सिंग राजपूत, दुसरे अधिवेशन कंगना आणि अर्णव गोस्वामी तिसरे अधिवेशन मनसुख हिरेन अशा प्रकारे वाया घालवणारा विरोधी पक्ष महाराष्ट्राला पहिल्यांदाच लाभला आहे. 

ते म्हणाले, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोनाचा प्रसार यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यासारख्या एकाही विषयाला हात न घालता तथ्यहीन व सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातील निगडीत नसणाऱ्या प्रश्नांसाठी अधिवेशन वाया घातले. कदाचीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सामान्य जनतेचे प्रश्‍न मांडल्यानंतर आपलेच केंद्रातले भाजपचे सरकार अडचणीत येईल की काय अशी भिती वाटत असावी. त्यामुळे मूलभूत प्रश्नांना बगल देऊन भावनीतेचे राजकारण मुख्यतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अशा भावनीक  व जनतेत भ्रम निर्माण करणा-या राजकीय खेळांच्या पलीकडे खुप खोलवर दडलेला सह्याद्रीच्या खो-यातील महाराष्ट्र आहे. असले प्रश्न म्हणजे महाराष्ट्र नाही हे आता वेगळ सांगायला नको. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन आम्ही परमवीर सिंग प्रकरणातील सत्य जनतेसमोर यशस्वीपणे मांडू.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com