'अजूनही वेळ गेली नाही, 'या' फॉर्म्युल्यावर भाजप-शिवसेना युती शक्य'

उद्धव ठाकरे (uddhav Thackeray)हे अत्यंत साधेभोळे आणि चांगले गृहस्थ आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा भाजपात परतावे,'
Shivsena - BJP alliance.jpg
Shivsena - BJP alliance.jpg

मुंबई: 'उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती, पण अडीच- अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावावर एकमत न झाल्याने शिवसेना-भाजपची युती (Shivsena- BJP Alliance)  तुटली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (NCP- Congress)  त्यांनी आघाडी करणंही योग्य नव्हतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युती होऊ शकते,' असा आशा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Aathvale)  यांनी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केले. "आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात,' असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे राज्यात भाजपाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यानंतर  महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळले असावे, त्यामुळे कदाचित पुन्हा त्यांची इच्छा भाजपसोबत येण्याची असावी, अशी इच्छा रामदास आठवले व्यक्त केली. 

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आठवलेंनी तोंडभरून कौतुक केले. ' दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे खरे  वारसदार आहेत.  उद्धव ठाकरे हे अत्यंत साधेभोळे आणि चांगले गृहस्थ आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा भाजपात  परतावे,' असा सल्लाही  आठवले यांनी दिला. 

तर त्यानी देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले आहे. फडणवीस अभ्यासू  नेते आहेत. विरोधी पक्षनेते या नात्याने ते विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत असतात. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घ्यावं. त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावं,' असंही आठवले म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएमध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

तर यावेळी त्यांनी नेहमीप्रणाणे त्यांच्या शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कविताही म्हटली.  'उद्धव ठाकरेंनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे... फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे,' अशी कविताही गायली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com