अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री आमदार यांची बैठक घेण्यात आली यावेळी निधीच्या मागणी वरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.
मात्र अजित पवार यांनी अकोला जिल्हाला थोडा निधी वाढून दिला त्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मिळालेल्या निधी वरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमरावती विभागाची आढावा बैठक आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत लोकप्रतिनिधीची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्हाला 300 कोटीची तरतूद करण्यात आली. त्याच प्रमाणे यवतमाळ 325 कोटी,बुलढाणा 295,वाशिम 185 तर अकोला साठी 185 कोटीचा निधी देण्यात आला
मात्र या निधीवर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली,मी सरकार मध्ये आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही,विदर्भाचा अनुशेष भरून निघावा या करिता आपण अधिक निधीची मागणी केली होती मात्र निधी वाढून देण्यात आला नाही,पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.