थोरातांच्या संगमनेरमध्ये निर्बंध कडक, म्हणाले, व्हा आठच्या आत घरात

पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शहर पोलिसांनी दवंडीद्वारे दिल्याने, आजपासून आठच्या घरात या सूत्राचे पालन करावे लागणार आहे.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

संगमनेर : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी 15 एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहेत. त्यानुसार रात्री आठनंतर औषधांची दुकाने व 10 पर्यंत सशर्त परवानगी दिलेले घरपोच सेवा देणारे उपक्रम व पार्सल सेवा देणारी हॉटेल्स व रेस्टॉरंट वगळता, संगमनेर शहर परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. तसे पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून सांगितले.

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संघटना, संस्था कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरसावल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत शासनाने घालवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना थोरात यांनीही दिल्या आहेत.

या कालावधीत पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शहर पोलिसांनी दवंडीद्वारे दिल्याने, आजपासून आठच्या घरात या सूत्राचे पालन करावे लागणार आहे. 

जिल्ह्यातील नगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्‍यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पोलिस व महसुल प्रशासनाला दिले आहेत.

संगमनेर शहर पोलिसांनी काल सकाळपासूनच फिरत्या वाहनावरील ध्वनिवर्धकाद्वारे दवंडी पिटवून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची आणि उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाईची माहिती दिली आहे.

निर्बंधीत कालावधीत केवळ औषधांची दुकाने व घरपोच सेवा देणारे उपक्रम अथवा दुकानात येणारा माल खाली करुन घेण्यास मुभा असेल. निर्बंध शिथील असलेल्या कालावधीत सामाजिक अंतर आणि मास्क या दोन्ही गोष्टींचे दुकानदार, ग्राहक आणि नागरिक यांना काटेकोरपणे पालन न केल्यास कारवाईचा सामना करावा लागेल. रात्री आठ नंतर पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने फिरताना आढळल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड, विनामास्कसाठी पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली सुरु असलेल्या औषधांच्या दुकानातही नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांनाही कारवाईचा सामना करावा लागेल. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत लग्नकार्यासाठी पन्नास तर अंत्यविधीसाठी विस जणांच्याच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com