जयंत पाटलांच्या माध्यमातून आमदार काळे आणणार आणखी ४४ कोटी

गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबीत असलेले हे काम काळे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणले.
Aushutosh kale.jpg
Aushutosh kale.jpg

कोपरगाव : ‘‘गोदावरी (Godavari) कालव्यांवरील जीर्ण बांधकामे नव्याने बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलेली प्रशासकीय मान्यता ही कालवे रुंदीकरणाची सुरवात आहे. आणखी ४४ कोटी रुपयांच्या खर्चास लवकरच मान्यता मिळेल. कालव्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहचविण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे,’’ असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. (MLAs will bring another Rs 44 crore through Jayant Patil)

गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबीत असलेले हे काम काळे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणले. त्याबद्दल कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, महेंद्र शेळके व गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांच्या हस्ते पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

काळे म्हणाले, ‘‘वहनक्षमता कमी झाल्याने उजवा कालवा सव्वाचारशे क्सूसेक्स वेगाने वाहतो. त्याची क्षमता सव्वासातशे क्यूसेक्स, तर डावा कालवा तीनशे क्यूसेक्सने वाहतो. त्याची क्षमता सव्वाचारशे क्यूसेक्स करायची आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २२ जीर्ण बांधकामे पूर्ण करण्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाच मान्यता मिळाली. उर्वरित बांधकामे पूर्ण करण्यासाठी आणखी ४४ कोटी रुपये खर्चास मान्यता मिळेल. ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यानंतर वेगाने मातीकाम पूर्ण करून कालव्यांची वहनक्षमता वाढविणे शक्य होईल. गोदावरी कालव्यांच्या दृष्टीने हा क्रांतिकारक निर्णय झाला आहे.’’

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी कालवे रुंदीकरणच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. गोदावरी कालव्यांची वहनक्षमता दीडपटीने वाढली की कमी कालावधीत आवर्तन पूर्ण होईल. ओव्हर फ्लोचे जास्ती जास्त पाणी लाभक्षेत्रात जिरविणे व साठविणे शक्य होईल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

हेही वाचा...

शिवसेनेकडून दिव्यांगांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप

मिरजगाव : परिसरातील अपंग व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन मिरजगाव शिसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी परिसरात शिवसेना पक्ष वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, बळीराम यादव, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, सुभाष जाधव, शिवाजी नवले, बबन दळवी, मालोजीराजे भिताडे, दीपक गांगर्डे, संजय शेलार, शंकर धतुरे, बाळासाहेब निंबोरे, मयूर चव्हाण, अमोल देशमाने, सूरज शेंडगे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या भरीव कामे सुरू आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील सर्वच स्तरातील लोकांना भरीव मदत केली आहे. पक्ष बांधणी व विस्तारासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.’’
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com