मुंबई : "सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत. त्यामागे सरकार जबाबदार असेल" असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यव्यापी बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मेटे यांनी हा आरोप केला आहे.
या सरकारच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आरक्षणावर स्थगिती आल्यावर मराठा समाजात असंतोषाचा भडका उडाला. परंतु या असंतोषाची दखल घेण्याची तसदी पण राज्य सरकारने घेतली नाही. या अरकरच्या उदासीन भूमिकेवर विचार करणे आणि पुढील दिशा निश्चिती करण्यासाठी मुंबईत या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या केले आहे.
या बैठकीस सकल मराठा समाज मुंबई तर्फे सर्व प्रमुख समन्वयकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करण्यात येत आहे. मराठा समाजाचे आंदोलन सद्यस्थितीत दिशाहीन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारवर पुन्हा दबाव निर्माण केला नाही तर २५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सूनवणीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी व मराठा समाजासाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा समाजाला जास्तीत जास्त कसा मिळू शकेल यावर या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
तरी सकल मराठा समाज, मुंबई आपणा सर्व समन्वयक, विविध संघटना यांना सदरच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. 3 पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाचे संत साहित्य संमलेन..अध्यक्षपदी चकोर बावीस्कर#PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews https://t.co/APjI4fXYVD
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 20, 2020

