'ती' बातमी चुकीची ; मुंबईची परिस्थिती भयावह...

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
Corona Fear
Corona Fear

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार ज्या उपाययोजना करीत आहेत, त्या पुरेशा नाही. कोरानाबाबतचे सरकारचे काम कैातुकास्पद नसल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. कोराना संकटाविरूद्ध लढण्यासाठी राज्य सरकारचे काम उल्लेखनीय असून त्यांचे निती आयोगाने कैातुक केल्याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. निती आयोगाने आपल्या ट्विटरद्वारे याबाबत खुलासा केला आहे.

राज्य सरकारचे मुंबई मॅाडेल देशभरात वापरले जाणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता, मात्र, हा दावा चुकीचा असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार मात्र दिशाभूल करीत आहेत, असे निती आयोगाने स्पष्ट केले आहे. 

आयसीएमआर आणि निती आयोग यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीला राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. निती आयोग आणि आयसीएमआर यांनी या बैठकीत राज्य सरकार राबवित असलेल्या उपाययोजनांचे मुंबई मॅाडेलचे कैातुक केले असून हे मॅाडेल देशभर राबविण्यात येणार असल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेने स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे घरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. मोबाईल फिव्हर क्लिनिक, खासगी डॅाक्टरांचा सहभाग, ऑक्सिजनची सुविधा असलेले कक्ष आदीच्या माध्यमातून कोरानावर नियंत्रण आणण्यात येत आहे, या उपाययोजनामुळे निती आयोग आणि आयसीएम प्रभावित झाल्याच्या उल्लेख या वृत्तात करण्यात आला होता. हे वृत्त चुकीचे असून मुंबईत कोरानाची स्थिती भयानक असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे.  


ही बातमीपण वाचवा : लोकांचे जीव जात असताना संमेलनाची चर्चा करताय? 
 

पुणे : राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. शेकडो लोक कोरोनाशी झुंजत आहेत. अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी आगामी मराठी साहित्य संमेलनाचा विचार आणि त्यावर चर्चा कशी होऊ शकते, असा सवाल करून संमेलन होणार की नाही आणि झाले तर कुठे होणार, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.  या वर्षी साहित्य संमेलनासाठी नाशिक, अमळनेर व दिल्ली येथून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, कोरानाचे संकट गेली दोन महिने राज्यभर घोंगावत असल्याने संमेलन रद्द करण्याचा विचार महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता नाशिक व अमळनेर या दोन्ही ठिकाणी संमेलन होणे कितपत शक्‍य आहे, याबाबत शंका आहे. या पार्श्‍वभूमीवर "सरहद' या संस्थेच्या वतीने संमेलन दिल्लीत घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. साहित्य संमेलनात खंड पडू नये, ही सरहदची त्यामागची भूमिका आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com