अर्णब गोस्वामींच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्या ! कोश्‍यारींची गृहमंत्र्यांशी चर्चा 

पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे.
अर्णब गोस्वामींच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्या ! कोश्‍यारींची गृहमंत्र्यांशी चर्चा 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षेतेची काळजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना लागून राहिली आहे. गोस्वामी यांची तशी काळजी घेतली जावी म्हणून त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. 

अर्णब गोस्वामी यांना काही दिवसापूर्वी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काल मोबाईल वापरल्याने त्यांना तळोजा तुरूंगात हलविण्यात आले आहे. आपल्या जिवीतास धोका आहे तसेच पोलिसांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. त्यांना अटक झाल्यापासून भाजप नेते गोस्वामीच्या मागे उभे राहिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील, राम कदम, किरीट सोमैय्या यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आणि दिलेल्या वागणुकीचा निषेध केला आहे. राम कदम यांनी तर गोस्वामी यांच्या जिवीतास काही झाले तर राज्यातील आघाडी सरकार त्याला जबाबदार असेल असे म्हटले आहे. 

अर्णब गोस्वामीप्रकरणी आमदार राम कदम यांनी नुकतीच राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. आज राज्यपालांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशीच चर्चा करून गोस्वामी यांच्या प्रकृतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच गोस्वामींच्या नातेवाईकांना भेटू द्यावे असेही म्हटले आहे. 

काय आहे अन्वय नाईकप्रकरण 
इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे 

अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे 5 कोटी 40 लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. 

त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com