रेल्वेत नाश्‍ता-पाणी नाही अन् भाडेवाढ काय करताय : शिवसेना खासदार कडाडले

रेल्वेत पिण्याचे पाणी नाही, नाश्‍ता नाही मग भाडेवाढ का? असा प्रश्‍न रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थितीत केला.
 Vinayak Raut .jpg
Vinayak Raut .jpg

कुडाळ : रेल्वेत पिण्याचे पाणी नाही, नाश्‍ता नाही मग भाडेवाढ का? असा प्रश्‍न रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थितीत केला. 

राऊत यांनी संसदेत सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडल्या. वाढत्या महागाईने अधिच क्रयशक्ती कमी झालेल्या सर्वसामान्य लोकांचे जगणे कसे कठीण झाले आहे, याचे वास्तव मांडले.

लोकांचे जगणे आनंदी व्हावे, म्हणून वार्षिक बजेट व पूरक बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी केली. लोकांच्या कल्याणासाठी केंद्राने नेमकी कोणती पावले उचलली आहेत? नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना 'फेस्टिव्हल एक्‍सप्रेस' अशा गोंडस नावाखाली 30 टक्के प्रवासी भाडेवाढ करून कसे लुटत आहेत याकडे लक्षवेधले. रेल्वेमध्ये पिण्याचे पाणी नाही, नाश्‍ता नाही मग तिकीट भाडेवाढ का? असा प्रश्‍न उपस्थित केला.  

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या फेज-3 अंतर्गत जास्तीत जास्त दुर्गम, पहाडी भागातील रस्ते केले जावेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, अशी विनंती त्यांनी केली. एनएचआरएम अंतर्गत धावणाऱ्या 108 या सेवेची झालेली दुरवस्था याकडेही राऊत यांनी लक्षवेधले. 108 ची सेवा पुनर्जीवित करून आरोग्य जपण्यासाठी सरकारने पावले उचलावी, अशी विनंती त्यांनी केली.

हे ही वाचा...

सत्ताधारी शिवसेनेत पडले दोन गट 

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील मत्स्य उद्योगांसाठी असलेल्या भूखंडांवर 1996 मध्ये शाळेचे आरक्षण टाकण्यात आले. तेथील उर्दू शाळा रस्त्यालगत असल्याने अपघाताच्या शक्‍यतेने पर्यायी ठिकाणी शाळा हलविण्यासाठी हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले होते. पालिकेच्या शुक्रवारच्या (ता. १९ मार्च) बैठकीत ते रद्द करून उद्योगासाठी ठेवण्यात आले; मात्र या वेळी सत्ताधारी शिवसेनेत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. या भूखंडाची निविदा प्रक्रिया होणार असल्याने भूखंड मिळविण्यासाठी स्पर्धा होणार आहे. यामुळे अनेकांचे मनसुबे धुळीत मिळाले आहेत.

पालिकेच्या विशेष सभेमध्ये मिरकरवाडा येथील उद्योगासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर 1996 मध्ये शाळेचे आरक्षण टाकण्यात आले होते. उर्दू शाळा रस्त्यालगत होती. नर्मदा सिमेंट फॅक्‍टरीतील कच्च्या मालाची डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. यामुळे तेथे अपघात होण्याच्या शक्‍यतेने पर्यायी ठिकाण म्हणून हे आरक्षण टाकण्यात आले; आता हा मुद्दा शिवसेनेच्या सत्तेत पटलावर आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com