महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार यावर पवारांचे मोठे वक्तव्य 

राष्ट्रवादी २२ वर्ष टिकली. दिवसेन दिवस जनतेचा विश्वास वाढत आहे. अनेक जण पक्ष सोडून गेले पण पक्षामध्ये नवीन नेतृत्व तयार होत असल्याचे पवार यांनी सांगितले.
 Sharad Pawar .jpg
Sharad Pawar .jpg

मुंबई : आपण महाराष्ट्राला वेगळ्या विचारांचे सरकार दिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी (Ncp) एकत्र काम करु शकते असे कोणाला पटले नसते. पण आपण लोकांना पर्याय दिला त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आहेत. त्यामुळे आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Sharad Pawar said that the state government will complete 5 years)

यावेळी पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती, अशी आठवण करुन देताना हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या देशामद्ये अनेकांनी अनेक पक्ष काढले, १९७७ मध्ये या देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात सरकार आले पण ते दीड ते दोन वर्षा पेक्षा जास्त काळ टिकले नाही. काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व पक्षात तयार झाले. राष्ट्रवादी २२ वर्ष टिकली. दिवसेन दिवस जनतेचा विश्वास वाढत आहे. अनेक जण पक्ष सोडून गेले पण पक्षामध्ये नवीन नेतृत्व तयार होत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची स्वतंत्र बैठक झाली आणि चर्चा केली, असे सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असे सांगत पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिले. ''शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही. मात्र, महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे.

ज्यावेळी जनता पक्षाचे सरकार आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला मात्र, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला, अशी आठवण यावेळी शिवसेने विषयी बोलताना त्यांनी सांगितली. 

त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे पवार म्हणाले. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com