वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी'' : मनसेची टीका 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांच्या सह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली.
Varun Sardesai, Sandeep Deshpande jpg
Varun Sardesai, Sandeep Deshpande jpg

मुंबई : राज्य सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. तर राज्य सरकारमधील काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाईंना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

रविवारी राज्य सरकाने राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांच्या सह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तर अनेक नेत्यांनी नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था

देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे देशपांडे यांनी सरदेसाई यांच्या वरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

संदीप देशपांडे आपल्या टि्विटमध्ये म्हाणाले की, वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय...

संजय राऊत काय म्हणाले ?

राज्यातील नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं, असं मला वाटत नाही. कारण आमचीही सुरक्षा व्यवस्था यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही. मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही.

सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही."

नितेश राणे यांचीही टीका

राज्य शासनाने काल एकूण 13 जणांना नव्याव वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावरु नितेश राणे यांनी मंत्रालयातल्या हस्तक्षेपामुळे तिथले अधिकारी सरदेसाईंवर चिडले, असल्याने त्यांना सुरक्षेची नक्कीच गरज आहे, असा चिमटा राणे यांनी काढला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com