संजय राऊतांनी यासाठी केले देवेंद्र फडणविसांचे अभिनंदन ! 

फडणविसांच्या मुलाखतीविषयी दुसरा प्रश्‍न विचारला त्यावर ते म्हणाले, की मी फडणविसांची मुलाखत छापणार आहे. ते जे बोलतील तशी ती प्रसिद्ध होणार आहे.
 संजय राऊतांनी यासाठी केले देवेंद्र फडणविसांचे अभिनंदन ! 

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ नेहमीच मोदी-शहांसह राज्यातील फडणवीस आणि इतर नेत्यांविरोधात धडधडतांना दिसली. आज मात्र याच तोफेंने चक्क माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांवर कौतुकांचा वर्षाव केला आणि अभिनंदनही केले. 

ही मुलुखमैदानी तोफ म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत. त्यांना बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी काही प्रश्‍न विचारले. तेथे शिवसेना लढणार का ? किती जागी लढणार ? तसेच बिहारचे प्रभारी म्हणून फडणविसांवर भाजपने जबाबदारी टाकली आहे. आपणास काय वाटते ? यावर राऊत म्हणाले, की महाराष्ट्रातील एक नेता बिहार राज्यात निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असेल तर त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. 

या प्रश्‍नांनंतर त्यांना फडणविसांच्या मुलाखतीविषयी दुसरा प्रश्‍न विचारला त्यावर ते म्हणाले, की मी फडणविसांची मुलाखत छापणार आहे. ते जे बोलतील तशी ती प्रसिद्ध होणार आहे. मी आजपर्यंत अनेक मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतीत जे विचारले ते डिलिट केले नाही. तशीच ही मुलाखत येईल. जरी फडणविसांनी आमच्या पक्षावर टीका केली असली तरी. टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याचे स्वागतच केले पाहिजे. फडणविसच नव्हे तर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही मुलाखत घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही 
जर कोणी महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी करीत असेल तर ती सहन केली जाणार नाही. षंढासारखं गप्प बसणार नाही असा गंभीर इशरराराऊत यांनी दिला आहे. 

आज दोन्ही कॉंग्रेस मिळून शिवसेनेचे जे सरकार आले आहे ते पूर्ण पाच वर्षे चालणार आहे असे स्पष्ट करून ते म्हणाले, की मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. जर कोणी महाराष्ट्र आणि शिवसेनेची बदनामी करीत असेल तर सहन केली जाणार रनाही आणि षंढासारखं गप्पही बसणार नाही. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बिहारचे निवृत्त डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे यांच्यासह काही मंडळींनी मुंबई पोलिसांना बदनाक करण्याचा प्रयत्न केला त्यावर आम्ही आवाज उठविला. पांडे हे नोकरीचा राजीनामा देऊन जर सक्रिय राजकारणात उतरले असतील तर त्यांना विरोध करण्याचे कारण काय ? यापूर्वीही अनेक अधिकारी राजकारणात आले आहे. पांडे यांच्याशी माझे काही भांडण नाही. मात्र त्यांनी सुशांतप्रकरणात बिहार आणि महाराष्ट्रात संघर्ष पेटेल अशी भाषा केली. मुंबई पोलिसांविरोधात ते बोलू लागले तेव्हा आम्हीही त्यांना विरोध केला असे राऊत म्हणाले. 

सुशांतप्रकरणाची मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करीत होते. त्यानंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला. मुंबई पोलिसांपेक्षा तपासाला त्यांनाही अधिक वेळ लागला याकडे लक्ष वेधत राऊत यांनी आता आम्ही सीबीआय काय म्हणते ? कोणता निर्णय देते याची वाट पाहात आहोत. या प्रकरणात आमच्या एका मोठ्या नेत्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्नही झाला पण, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com