सचिन वाझे गृहमंत्र्यांचा भरवशाचा माणूस होता! 

विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे राजकारण तापलेले असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे रोखठोक सदर चर्चेचा विषय ठरले आहे.
 Sachin Waze, Anil Deshmukh .jpg
Sachin Waze, Anil Deshmukh .jpg

मुंबई : विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे राजकारण तापलेले असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे रोखठोक सदर चर्चेचा विषय ठरले आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे सरकारवरही निशाणा साधला होता. राऊत यांच्या लेखाचा हवाला देत भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या ट्विटर वरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''सचिन वाझे हा शिवसेनेचा, गृहमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळातील इतर लोकांचा लाडका आणि भरवशाचा माणूस होता, हे स्वतः राऊत यांनीच कबूल केले आहे. सचिन वाझे वसूली करत होता, हे सगळ्यांना माहीत होत. कृत्य बाहेर आले म्हणून सारवासारव करण्याचा तुमचा कारभार जनतेला माहीत आहे'', अशी टीका भाजपने केली आहे. 

''एक मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करतो. त्याबद्दल आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दसुद्धा काढत नाहीत. स्वतःच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही की, त्या अधिकाऱ्यांवर? तुमचे 'डॅमेज' झालेल्या सरकारची झळ महाराष्ट्राच्या जनतेला सोसावी लागत आहे'', असेही भाजपने म्हटले आहे. 

संजय राऊत काय म्हणाले होते? 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशमुखांकडे दिले. 

गृहमंत्री पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो,''  

''अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. सचिन वाझेला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात (Mumbai Police) बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?" असा सणसणीत आहेर शिवसेना खासदार व शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पर्यायाने आपल्या महाविकास आघाडीला दिला होता. 

'सौ सोनार की एक लोहार की' असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?,'' असेही राऊत यांनी म्हटले होते.

अँटिलिया बाँब प्रकरण, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या, सचिन वाझेंना (Sachin Waze) अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डाॅ. परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्र्यांवर केलेले शंभर कोटींचे आरोप या पार्श्वभूमीवर राऊत यांनी 'रोखठोक' या सदरातून सरकारला शालजोडीतून फटके मारले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com