वाझे प्रकरणाची केंद्रानं चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल!

जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला पोलिसांना भाग पाडलं. यामागे नेमकं कोण आहे, हे बाहेर यायला हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
Raj Thackeray demands enquiry of vaze case from central government
Raj Thackeray demands enquiry of vaze case from central government

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सचिन वाझे यांनी कोणी सांगितल्याशिवाय गाडी ठेवली नसणार. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला पोलिसांना भाग पाडलं. यामागे नेमकं कोण आहे, हे बाहेर यायला हवं. मात्र, राज्य सरकारकडून हा तपास होणार नाही. त्यामुळे या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. 

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मात्र, या प्रकरणांमुळे मुळ विषय बाजूला राहत असल्याचे ते म्हणाले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असलेली गाडी उभी करणं, ही शुल्लक गोष्ट नाही. या प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी केली जाऊ शकत नाही. लोकांचा सरकार व पोलिसांवरून विश्वास उडाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा केंद्राने तपास करावा. असे झाल्यास फटाक्यांची माळ लागेल. कोण-कोण आत जाईल, याची कल्पनाही करू शकत नाही, असेही ठाकरे म्हणाले. 

अंबानींच्या घराखाली स्फोटकांची कार हा मुळ विषय आहे. बाँम्ब पोलिस ठेवतात, हे मनाला पटतच नाही. या सगळ्या प्रकरणात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. जिलेटिन आले कुठून. अंबांनीच्या सुरक्षेमध्ये इस्त्राईली लोक आहेत. मध्य प्रदेश सरकारची सुरक्षा आहे. अशा सुरक्षाव्यवस्थेत या रोडवर एक गाडी चोवीस तास उभी राहते. असे धाडस पोलिस करू शकणार नाहीत. अंबांनींकडून पैसे काढणे, सोपे आहे का? त्यामुळे पैशांसाठी हा कट रचल्याची ही थिअरी चुकीची आहे. ही गाडी कोणी ठेवण्यास सांगितले, हे बाहेर यायला हवे. केंद्राने तत्काल हस्तक्षेप करावा, असे ठाकरे म्हणाले. 

देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी गोळा करण्याच्या सुचना वाझेला दिल्याचे आरोप केले आहेत. अशी घटना महाराष्ट्र किंवा देशातही कधी घडली नाही. गृहमंत्र्यांनी अशी गोष्ट करायला सांगणे, महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 

परमबीर सिंग यांच्या बदलीचे कारण काय?

परमबीर सिंग यांची बदली का केली, या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारने अद्याप दिलेले नाही. जर त्यांचा या प्रकरणात सहभाग होता तर बदली का केली? त्यांची चौकशी करायला हवी होती. यातून सरकारला काय सांगायचे आहे. जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com