परमबीरसिंह यांच्या भविष्याचा फैसला आज; कधीही होऊ शकते अटक

राज्य सरकारने उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात 9 जून पर्यंत परमबीरसिंह यांना अटक करणार नसल्याची हमी दिली होती.
 Parambir Singh .jpg
Parambir Singh .jpg

मुंबई : अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात 9 जून पर्यंत परमबीरसिंह यांना अटक करणार नसल्याची हमी दिली होती. आज ती मुदत संपत आहे, आज उच्च न्यायालय (High Court) काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Parambir Singh's petition will be heard in the High Court today)

परमबीरसिंह यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दाखल केला आहे. परमबीरसिंह हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे हे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीरसिंह यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने माझ्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच परमबीरसिंह यांच्या वर्तणुकीबद्दल, त्यांच्या संपत्तीबद्दल मोठे आरोप त्यांनी केले. त्यानंतर अकोला येथे झिरो नंबरने त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केला आहे.  हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी परमबीरसिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटिकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती एस. जे. काथवाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांनी न्यायालयीन कामकाजाचा विक्रम 21 मे रोजी नोंदविला. खंडपीठाने परमबीरसिंह यांना पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला होता. परमबीरसिंह यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी तर राज्य सरकारतर्फे दलायास खंबाटा यांनी बाजू मांडली होती. परमबीर यांची चौकशी करणारे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी माघार का घेतली? कारण परमबीर यांना त्यांनी थेट सांगितले होते की व्यवस्थेविरोधात जाऊ नका, तुमच्याविरोधात एकापाठोपाठ एक खटले भरू. याचे रेकॉर्डिंग बाहेर आले आणि पांडे यांनी माघार घेतली. तरीही परमबीरसिंह यांच्याविरोधात गुन्हे दाखल होणे सुरूच आहे. प्रकरणी पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. इतकी वर्ष त्यांच्याकडे एक तक्रार म्हणून का पाहण्यात आले नाही, आता अचानक गुन्हा दाखल झाला? हे गुन्हे निव्वळ परमबीरसिंह यांच्यावर सूड उगवण्यासाठीच दाखल झालेत, असा मुद्दा त्यांनी मांडला होता.

दुसरीकडे राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार सीबीआय त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काम करत आहे. पोलिस अधिका-यांना पुन्हा सेवेत घेणे किंवा त्यांची बदली का केली, हा या तपासाचा भाग असू शकत नाही. यासाठी त्यांना राज्य सरकारच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे. तसेच घाडगे यांनी परमबीरसिंह यांच्याविरोधात चार-पाच वर्षांपूर्वीच तक्रार केलेली होती. त्यामुळे सरकारची सूडबुद्धी नाही. हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण देता येत नाही, असे खंबाटा यांनी सरकारच्या वतीने सांगितले. त्यांचा युक्तिवाद सुरू असतानाच रात्री बाराचे ठोके घड्याळात वाजले. न्यायालयाने बारा वाजले असल्याने आम्ही आमचे काम थांबवतो. तोपर्यंत सरकारने परमबीरसिंह यांना अटक करू नये. असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com