निर्मला सीतारामन खोट्या बोलत आहेत : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे. तरीही अर्थमंत्र्यांकडून दावा करण्यात आला की, मजुरांच्या प्रवासाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. हे खरं नाही, असेही अनिल देशमुखम्हणाले.
nirmala sitaraman
nirmala sitaraman

मुंबई : स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन खोट्या बोलत आहेत, अशी टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे तिकीटचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, निर्मला सीतारामन यांचे ते वक्तव्य खोटे असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

``स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला धक्काच बसला; परंतु ते खोटे आहे. रेल्वेचे तिकीट केंद्र सरकार देत नाही. त्याचा सर्व भार राज्य सरकार उचलत आहे. या अगोदर जे मजूर रेल्वेमार्फत गेले, त्या सर्व श्रमिकांकडून पैसे घेतले गेले. मजुरांजवळ काम नाही. त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे मजुरांचा प्रवास मोफत करा, अशी मागणी आम्ही त्याचवेळी केली होती. मात्र, तरीही त्यांनी ऐकले नाही, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे. तरीही अर्थमंत्र्यांकडून दावा करण्यात आला की, मजुरांच्या प्रवासाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. हे खरं नाही, असेही ते म्हणाले.

आजच्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना निर्मला सीतारामान म्हणाल्या की मला विरोधी पक्षांना आवाहन करायचे आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि या मुद्यावरून राजकारण करू नये. स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी त्यांनी समजून घ्यायला हवी. सरकारकडून जारी करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज एक नाटक असल्याचा आरोप काँग्रेसकडून होतोय. पण खरे ड्रामेबाज तेच आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना आणि सामान घेऊन त्यांच्यासोबत चालून त्यांची मदत करायला हवी होती.

काँग्रेसशासित आणि त्यांच्या सहयोगी राज्यांत या मुद्द्याचे राजकारण होत असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यांतून मागणी करावी आणि हव्या तेवढ्या रेल्वे बोलवावायला हव्या होत्या. ते हे का करत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. मजुरांनी जेथे आहेत तेथेच राहावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले  होते. सरकार त्यांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेसाठी सर्वतोपरी मदत करत आहे.परंतु, लोकांना घरी जायचंच असल्याने केंद्र आणि रेल्वेनं विशेष रेल्वे चालवण्याचाही निर्णय घेतला. रेल्वे तयार आहेत, राज्यांकडून जेवढ्या रेल्वेची मागणी केली जाईल तेवढ्या रेल्वे त्यांना पुरवण्यात येतील, असेही सीतारामन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com