राणेंचा यु-टर्न, म्हणाले, 'तर आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंचं स्वागत करू'

विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय त्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे
Narayan Rane Uddhav Thackeray.jpg
Narayan Rane Uddhav Thackeray.jpg

मुंबई : सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळाच्या chipi airportउद्घाटनावरुन राजकीय वातावरण चांगलेच  तापले.  दिल्ली येथे नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cm thackeray यांना बोलविण्याची गरज नसल्याचे मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते.

त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्यूत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुर झाली आहे. आता नारायण राणे narayan rane यांनी यु-टर्न घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

“सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. हे विमानतळ ९ ऑक्टोबरला सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय त्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर त्यांचं स्वागत करू,'' असं राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

''हे विमानतळ पुर्ण होण्यासाठी नारायण राणे यांनीच सातत्याने पाठपुरावा केला असून याचे पूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच जाते,'' याबाबतची फेसबुक पोस्ट नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश यांनी केली आहे. 

नितेश राणे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ``सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे नारायण राणे यांचेच स्वप्न होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनी २००९ साली विमानतळ मंजूर झाले. तसेच, ते २०१४ पर्यंत पालकमंत्री असतांना विमानतळाचे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. विमानतळ हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने केंद्राच्या सर्व परवानगी राणे यांनीच मिळवून दिल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला. तर, लोकांची दिशाभूल करून अडथळे निर्माण केले होते. मात्र, आज विमानतळ पूर्ण होताच, विमानतळाला विरोध करणारे शिवसेनेचे लोक, आज श्रेय लाटायला पुढे-पुढे करत आहेत. तर, २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याशी काडीचा संबंध नसलेले खासदार विनायक राऊत फुकटच्या श्रेयासाठी बडबड करत आहेत.''
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com