आघाडीतील वाद चव्हाट्यावर ; पटोलेंचा ‘लेटरबॉम्ब’ 

नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
1Nana_20Patole_2C_20Uddhav_20Thackeray.jpg
1Nana_20Patole_2C_20Uddhav_20Thackeray.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ५ आणि ६ जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. एका खात्याने काढलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे अधिवेशनाआधीच काँग्रेसनेच विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. Nana Patole letter to Chief Minister Nana Patole

या विधिमंडळाच्या अधिनवेशनात महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे , अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील वाद चव्हाट्यावर आला आहे.  राज्याच्या खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदांवर बोट ठेवून, या कामांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे  खाते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित असल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

ठाकरे-पटोले यांच्यातील मतभेद वाढले 
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास ठाकरे यांनी पटोले यांना विरोध केला होता. तरीही पटोले यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे-पटोले यांच्यातील मतभेद वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी आता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामांवर शंका उपस्थित करीत, पत्रच पाठविल्याने छुपा संघर्ष उघड झाल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे यांनाच भाजप  ‘टार्गेट’ करणार
खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेत गैरव्यवहार असून, ठराविक लोकांनाच कामे दिल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. यानिमित्ताने अधिवेशनाआधीच काँग्रेसनेच विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. त्यामुळे पटोले यांच्या पत्राची दखल देत, भाजप नेते आता थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनाच ‘टार्गेट’ करणार असल्याचे स्पष्ट आहे. खनिकर्म महामंडळाने (नागपूर विभाग) एका प्रकल्पाला कोळसा पुरवठा करण्यासाठी निविदा काढून, ते काम ठराविक कंपनीला दिले आहे. 

गैरव्यहाराची चौकशी करा
या कामासाठी कंपनीची पात्रता नसतानाही निविदा मंजूर केल्या आहेत. निविदेप्रमाणे अटी-शर्ती पूर्ण नसतानाही या कंपनीला काम दिल्याकडेही पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. गरजेनुसार कोळसा पुरविण्याची या कंपनीची क्षमता नसल्याने त्याचा वीज उत्पादनावरही परिणाम होणार असल्याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले आहे. या गैरव्यहाराची चौकशी करावी आणि निविदा रद्द करावी, असेही यांनी म्हटले आहे. हे पत्र २३ जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com