Sarkarnama Banner - 2021-08-03T092320.426.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-03T092320.426.jpg

'आमचा सीएम जगात भारी, 'शिवपंख 'लावून द्या' मनसेचा टोमणा

संदीपदेशपांडे यांनी सर्वसामान्यांच्या लोकल प्रवाशाबाबत सरकारलाचिमटे काढले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे  Sandeep Deshpande यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकल सुरु करण्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खोचक टि्वट करुन देशपांडे यांनी सर्वसामान्यांच्या लोकल प्रवाशाबाबत सरकारला चिमटे काढले आहेत. 

आपल्या टि्वटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी.

माजी मंत्री सहाव्या निकाहाच्या तयारीत ; तिसऱ्या पत्नीची पोलिस ठाण्यात धाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकल सुरु करण्याबाबत काही दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्यावी.राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशारा देशपांडे यांनी तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
 
MPSC : अजितदादांनी शब्द पाळला!

“महाराष्ट्र सरकारनं निबंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल," असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं होतं.

''लोकल सुरु करा नाही तर आंदोलन करू'' असा इशारा भाजपनं राज्य सरकारला दिला आहे. लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय मंडळी भिडणार असं चित्र सध्या निर्माण झाले आहे. अनलॉकिंग करताना एकदम शिथीलता न देता हळू हळू निर्बंध उठवले जातील. येत्या काही दिवसांत मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com