OBC Reservation : राज्य मंत्रिमंडळ आज काय निर्णय घेणार 

जिल्हा परिषदनिवडणुकीवरआज राज्य मंत्रिमंडळाने महत्वाची बैठक बोलावली आहे.
OBC Reservation.jpg
OBC Reservation.jpg

मुंबई : ओबीसींचे आरक्षण, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या विषयावर आज राज्य मंत्रिमंडळाने महत्वाची बैठक बोलावली आहे. यात काय निर्णय होतो याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies election) निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचा (State election commission) आहे. राज्य सरकार त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. ओबीसी आरक्षण रद्द  (OBC Reservation) झाल्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विनंतीवजा आदेश गैरलागू असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Uddhav Thackeray बैठक बोलावलीआहे. या बैठकीला राष्ट्रवादी नेते, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कॉग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.   

ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक झाल्याने वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार, पालघर सहा जिल्हा परिषदांमधील आणि पंचायत समितीतील ओबीसी मतदारसंघातील निवडी 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या. तसेच येथे पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी केली होती. पालघर वगळता  इतर पाच जिल्ह्यांत कोरोनाची साथ कमी असल्याने तेथे निवडणूक जाहीर करण्यात आली.  87 जिल्हा परिषद गट आणि 119 पंचायत समिती येथे पोटनिवडणुका घेण्यासाठीचे वेळापत्रकही ठरविले. मात्र राज्य सरकारने कोरोनाचे कारण सांगून या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही यावर निवडणूक आयोगाला न्यायालयाला अहवाल द्यायचा होता. राज्य सरकारने कोरोनामुळे या जिल्ह्यांत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे नुकतीच दिवसांपूर्वी सुनावणी झाली.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनंतर या मुख्यमंत्र्यांवर संक्रांत? असंतुष्ट भाजप नेत्यांना यश 
नवी दिल्ली :  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन विजय रूपाणी यांना हटविण्यात आल्यानंतर आता भाजपने हिमाचल प्रदेशाचे  (Himachal Pradesh) मु्ख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांना तातडीने  बोलावून घेतले आहे.  हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी तीव्र आहे. राज्यात भाजपने नुकतीच जी आशीर्वाद यात्रा काढली त्यापासून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. नाराजीची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात असंतुष्ट भाजप नेत्यांना यश आले आहे.
 Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com