शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे जापर्यंत एकत्र तोपर्यंत सरकारला धोका नाही : अजित पवार 

ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबतही अजितदादांनी भाष्य केले.
शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे जापर्यंत एकत्र तोपर्यंत सरकारला धोका नाही : अजित पवार 

मुंबई : जोपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आहेत. तोपर्यंत ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. संध्याकाळी पावनेसहा वाजता भाजपचा एकही उमेदवार पुढे नाही तर आघाडीचे पाचही उमेदवार पुढे आहेत असेही अजितदादांनी सांगितले. 

आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात अजित पवार बोलत होते. त्यांनी ठाकरे सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांनी अडचणीच्या काळात कसे काम आणि प्रत्येक प्रश्‍नात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला याची माहिती दिली.

यावेळी अजितदादांनी भाजपवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. अजितदादा म्हणाले, की राज्यात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. पाचही जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. ते विजयी होतील असा विश्वास आहे. 

ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबतही अजितदादांनी भाष्य केले. ते म्हणाले, की ठाकरे सरकार आज पडणार, उद्या पडणार, महिन्याने पडणार असे सांगितले जात आहे. हे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधीपक्षाकडून सुरू आहे.मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हे सरकार पडणार नाही. जोपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आहेत. तोपर्यंत ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही. 

राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले. या संकटातच वादळाचा तडाखा बसला तरीही राज्य सरकारने प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न केला. अडचणीतून मार्ग काढऱ्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल पाहिले.

तिजोरीवर बोजा पडला. काटकसर करीत तरीही सरकारने काही योजनांसाठी पैसा उपलब्ध करून दिला. आम्ही तिन्ही पक्षाची मंडळी एकत्र आहोत. संकटातही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. काही प्रश्‍न आहेत त्याबाबतही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कारोना संकटात डॉक्‍टर्स, नर्स सफाई कामगार असेल किंवा जनता असे सर्वांचं सहकार्य मिळाले. एक दिलाने कोरोनाशी लढाई केली. काहीना स्वत:चा जीव गमवावा लागला. राज्य सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठसा उमटविऱ्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनी मंत्रिमंडळातील सहकार्यांवर विश्वास ठेवला. कोरोनाचा तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका अभ्यास केला आहे की ते डॉक्‍टर बनले आहे. आपण आज वर्षपूर्ती साजरी करीत आहोत. पण, पुढील चार वर्षासाठी आपणास काम करायचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com