संजय राऊत यांनी केले राहूल गांधींबद्दल महत्वाचे विधान : म्हणाले...

विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल.
Rahul Gandhi, Sanjay Raut
Rahul Gandhi, Sanjay Raut

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणं चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला लगावतानाच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात गांधी कुटुंबदेखील आहे. इतर नेतेही आहेत, आम्हीदेखील आहोत. असे किती प्रयत्न केले तर भविष्यात विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहील, संघर्ष करेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

पुढे ते म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानाक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो”.

“काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीतील पक्षाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. त्या पक्षाचे अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचे पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलणे आपली संस्कृती नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचे नेतृत्व करेल असे विचारल्या नंतर ते म्हणाले की, “हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचे सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे”.

पुढे त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणे नसते. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकते असे वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही”.

“अंतर्गत वाद सर्व पक्षांमध्ये होत असतात. समाजवादी, जनता दल युनायटेमध्येही अंतर्गत वाद आहेत. आम्ही तर म्हणतो हीच लोकशाही आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितले. 

सामनाच्या अग्रलेखात का म्हटले आहे?
 
राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत, असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच, लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटत असते. त्यातही प्रामाणिक योद्ध्याचे भय शंभर पटीने वाढत जाते, असे म्हणत राहुल गांधींविषय़ी वाटणारे भय शंभर पटीतले असल्याचा दावा ‘सामना’तून करण्यात आला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com