फालतू बोलू नका, मलाही फालतू बोलता येतं, पाशाभाईंनी राष्ट्रवादीच्या या नेत्याला सुनावले 

पाशाभाई हे आरएसएसच्या पंक्तीत जावून बसले आहेत. त्यामुळे तुमची भाषा शेतकऱ्याची राहिली नाही.
फालतू बोलू नका, मलाही फालतू बोलता येतं, पाशाभाईंनी राष्ट्रवादीच्या या नेत्याला सुनावले 

पुणे : उमेश पाटील तुम्ही अंड्याच्या बाहेरून कधी आला आहात हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही मला तथाकथित कसे म्हणता. फालतू बोलू नका, मलाही फालतू बोलता येते असे संतप्त झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते पाशाभाई पटेल यांनी सुनावले आहे. 

पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतकऱ्यांच्या जे नुकसान झाले आहे ते त्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी पाशाभाईंनी केली मात्र, सोलापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहीती दिली.

शेतकऱ्यांना घरे उभारण्याबरोबरच सर्वती मदत केली पाहिजे. तसा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे असे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांना केंद्राने मदत केली पाहिजे असे सांगत त्यांनी पाशाभाई आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

पाशाभाई हे आरएसएसच्या पंक्तीत जावून बसले आहेत. त्यामुळे तुमची भाषा शेतकऱ्याची राहिली नाही. पाटील यांच्या या विधानावर पाशाभाई संतप्त झाले. त्यांनी पाटील यांना खडे बोल सुनावतांना म्हटले की, माझं संपूर्ण आयूष्य शेतकऱ्यांसाठी खर्ची झालं आहे. तुम्ही मला नका शिकवू असे सांगत फालतू बोलू नका असा सल्ला दिला. 

शेतकऱ्यांचं राज्यात जे नुकसान झालं आहे. त्यांच्यासाठी पाशाभाईने आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून आमचे हक्काचे अडकलेले पैसे आणावेत असे सांगत थेट पाशाभाईंना लक्ष्य केले. त्यांच्या तथाकथित शब्दाने ते संतप्त झाले. उमेश पाटील फालतू भाषा करू नका, मलाही फालतू बोलता येते. तुमची जी भाषा आहे ना ते शेतकरी सहन करणार नाही. 

घरात कोणी आजारी पडला तर काय शेजाऱ्याकडे जावून पैसे उसने मागणार का ? केंद्राकडे काय बोट दाखविता असा सवालही पाशाभाईंनी केला आहे. हे दोन्ही नेते एबीपी माझाशी बोलत होते. 

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करू नका, फडणविसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वक्तव्य आहे ते अतिशय असंवेदशील आहे. त्यांनी थिल्लरबाजी करणं सोडावं असा हल्लाबोल विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

पत्रकारांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे तसेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या विधानाकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यात कोणतेही संकट आले की उठसूठ केंद्रांकडे बोट दाखविणे योग्य होणार नाही.

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करू नका. शेतकऱ्यांना मदत करा. आपण शेतकऱ्यांना काय मदत केली हे सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मदत करतीलच. केंद्राने कुठलेही पैसे अडकविलेले नाहीत.

ठाकरे सरकार फक्त टोलवाटोलवी करतात. आम्ही सत्तेवर असताना शेतकऱ्यांना मदत केली आहे. उद्धव ठाकरेंनी उगाच पंतप्रधान मोदींशी तुलना करू नये, शेतकऱ्यांना प्रथम मदत काय करणार हे सांगा. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com