प्रकाश आंबेडकर म्हणतात... हे तर चोर, खुन्यांचे सरकार

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सोमवारी (ता. २२) समक्ष भेटणार असून सभागृह बरखास्त करू नका, मात्र अशा चोरांचे व खुन्यांचे सरकार तातडीने बरखास्त करा, अशी मागणी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

मुंबई: राजकारणामधील गुन्हेगारी घटक व प्रशासनामधील गुन्हेगारी घटक एकत्र आल्यावर कशा करामती केल्या जाऊ शकतात, हे राज्यातील जनता सध्या पाहत आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट कसे द्यायचे व ते कसे वसूल केले जायचे, याबाबत पत्र लिहिले. मला वाटते की १०० कोटी हा आकडा कमीच असून यापेक्षा खूप अधिक टार्गेट दिले गेले असावे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले.  

आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सोमवारी (ता. २२) समक्ष भेटणार असून सभागृह बरखास्त करू नका, मात्र अशा चोरांचे व खुन्यांचे सरकार तातडीने बरखास्त करा, अशी मागणी करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केला. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. 

दरम्यान, फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असाही आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीर सिंह यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com