सायबर हल्ला झालाच नाही; मानवी चुकीमुळेच मुंबईत बत्ती गुल...

मुंबईमध्ये मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बत्तीगुलमागे सायबर हल्ल्याची शक्यता राज्य शासनाने व्यक्त केली आहे.
cyber attack did happen but not linked to the Mumbai grid failure
cyber attack did happen but not linked to the Mumbai grid failure

नवी दिल्ली :  मुंबईमध्ये मागील वर्षी12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बत्तीगुलमागे सायबर हल्ल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. मानवी चुकीमुळेच मुंबईची बत्ती गुल झाल्याचा दावा खुद्द केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी केला आहे.

मागील वर्षी अॉक्टोबर महिन्यात संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. फटका सर्वच क्षेत्राला बसला. या बत्ती गुलमागे चीनचा हात असल्याचा दावा केला जात आहे. चीनकडून सायबर हल्ला करून भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला आहे.

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल राज्याच्या सायबर सेलला याबाबत अहवाल देण्यास सांगितला होता. या अहवालामध्ये सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याचे देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

केंद्रीय मंत्री सिंग यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सिंग म्हणाले, अचानक वीज गेल्याचा तपास दोन टीमकडून करण्यात आला. त्यांनी अहवाल सादर केला असून मानवी चुकीमुळे वीज गेल्याचे त्यात म्हटले आहे. सायबर हल्लामुळे हा प्रकार घडला नाही. एका टीमने सादर केलेल्या अहवालात सायबर हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण त्याचा मुंबईतील ग्रीडमध्ये बिघाड निर्माण होण्याशी संबंध नाही, असेही सिंग यांनी स्पष्ट केले आहे.  सिंग यांनी केलेल्या या खुलाशामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून बत्तीगुलचे राजकारण केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, चौकशीचा अहवाल मिळाला आहे. त्यानुसार आठ जीबी डाटा परदेशातील अकाऊंटमधून ट्रांसफर केलेला असेल, अशी शक्यता आहे. सर्व्हरमध्ये लॉगीन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. काही काळ्या यादीतील आयटी कंपन्यांनी हा प्रयत्न केल्याची शक्यता असल्याची चौकशीत समोर आले आहे. मात्र, चीनचा उल्लेख सायबर सेलच्या अहवालात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नितीन राऊत यांनी याबाबत विधानसभेत संपूर्ण माहिती दिली जाईल असे सांगितले.

अमेरिकेतील रिकॉर्डेड फ्यूचर या कंपनीकडून सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या इंटरनेटच्या वापराबाबतचा अभ्यास केला जातो. त्यांनी केलेल्या अभ्यासातून ही गंभीर बाब समोर आली आहे. भारतातील पॉवर ग्रीडला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांच्या अहवाल स्पष्ट कऱण्यात आले आहे. या काळात चीनच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाला असावा, असा दावाही त्यात करण्यात आला आहे.  

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com