चंद्रकांतदादा म्हणतात, ""संजय राऊतांची मराठी शिकवणी घ्यायला मी तयार !'' 

कृषि विधेयक आणि बाबरी मशीदप्रकरणी आज आलेल्या निकालावर पाटील माध्यमांशी बोलत होते
चंद्रकांतदादा म्हणतात, ""संजय राऊतांची मराठी शिकवणी घ्यायला मी तयार !'' 

मुंबई : शिवसेनेने ज्यांना इतक हिनवल ते आता सोनिया गांधीना नेते मानतात. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आता सोनिया गांधी झाल्या आहेत अशी टीका करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चिमटे काढले. 

कृषि विधेयक आणि बाबरी मशीदप्रकरणी आज आलेल्या निकालावर पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की ज्यावेळी अयोध्येतील मशीद पाडण्यात आली त्यावेळच्या सरकारने काही कारण नसताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी , उमा भारती आदींवर नेत्यांविरोधात खटला दाखल केला मात्र आज सर्वांची मुक्तता झाली आहे. आम्ही आनंदीत आहोत. आम्हाला न्याय मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा अशी प्रतिक्रिय शरद पवार यांनी आजच्या बाबरी निकालाबाबत दिली आहे त्यावर पाटील म्हणाले, की प्रत्येक विषयावर अशी टिपण्णी केल्याशिवाय त्यांना त्यांची व्होटबॅंक मेंटन करता येत नाही. त्यांनी न्यायालयावर अविश्वास व्यक्त केल्याने ते अवमानकारक आहे. 

कृषी कायद्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, की कृषीविधेयक कायदा संपूर्ण देशभर लागू करावाच लागेल कारण आता राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे. केंद्राच्या कायद्याविरोधात राज्य सरकार ला कायदा करता येत नाही. कायदा करायचा असेल तर त्यांना राष्ट्रपतींची मंजुरी लागते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी श्री. पवार यांच्यावर टीका केली. अंगावर आलेल हे इतरांच्या अंगावर कस सरकावायच हे त्यांना व्यवस्थित जमत. मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे. श्री.पवार यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. केंद्राचा यामध्ये काही संबंध नाही. 

राज्यात सत्ता स्थापनेबाबत आज शिवसेनेच्या मुखपत्रात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेकडे लक्ष वेधत पाटील म्हणाले, की संजय राऊत यांना मराठीची शिकवणी दिली पाहिजे. राऊत यांची शिकवणी घ्यायला मी जातो. 'वन फाइन मॉर्निंग' वरून पाटील यांनी राऊतांना टिकेचे लक्ष केले आहे. 

''पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत," असे म्हणत शिवसेनेने पाटील यांना टोला लगावला आहे. त्याचा संदर्भ देत पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे. 

" राज्याच्या राजकारणात 'वन फाइन मॉर्निंग' अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,'' असा चिमटा या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com