शिवसेनेला भारतरत्न द्या..निलेश राणेंचा टोला 

नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.
sarkarnama (1).jpg
sarkarnama (1).jpg

मुंबई : नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरून सध्या राजकारण तापलं आहे. याबाबत काल शिवेसेनेचे लांजा – राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, ''सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल,''

या विधानामुळे साळवी अडचणीत आले आहे. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलासा करावा लागला आहे. आता नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. निलेश राणे याबाबत टि्वट केलं आहे.

ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचं. हेच धंदे करत करत इथंपर्यंत आले आहेत. प्रकल्पाला विरोध करून सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिला पाहिजे.''

निलेश राणे म्हणतात की शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापुर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे.

हेही वाचा मराठा आरक्षण धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार..संभाजीराजे
मुंबई : "मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहणार," असा हल्लाबोल खासदार संभाजीराजे यांनी आज महाविकास आघाडीवर केला आहे. संभाजीराजे पत्रकार परिषदेत बोलत होते. 
ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी काल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या समाजाला आर्थिकदृष्टया मागासवर्ग (ईडब्ल्यूएस) सवलती देण्याचे कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत ठरविण्यात आले. रखडलेल्या प्रवेशप्रक्रिया, नोकरभरती या निर्णयामुळे मार्गी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ''ईडब्यूएस आरक्षण हे काही फक्त मराठ्यासाठीच आरक्षण नाही तर ते आर्थिकदृष्या मागासवर्गीस असलेल्या तर खुल्या वर्गात येणाऱ्या अन्य समाजासाठीही लागू आहे. आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिल्यामुळे एसईबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार का, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com