अजितदादा म्हणाले, "बारा आमदारांच्या नावाची घोषणा झाली की 'ही' घोषणा करणार"

"वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील," अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.
ajitpawar1.jpg
ajitpawar1.jpg

मुंबई : "विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधी वाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील,"  अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

विधान परिषदेतील बारा आमदारांची राज्यपालांकडून नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे आहे, असे सांगून या मुद्‌याकडेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहिती दिली. 

विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने होणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीची घोषणाही तातडीने होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, "हे वैधानिक विकास महामंडळ झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे की ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” 

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकमेंकांविरूद्ध घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांकडून सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अस्खलित मराठीत अभिभाषण केलं. 

"कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या 500 प्रयोगशाळा कार्यरत आहे. कोरोनाविरूद्ध आजही लढा सुरू आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले. कोरोना योद्धाचे राज्यपालांनी आभार मानले.

"कोविडकाळात विशेष सर्वेक्षण करण्यात आली आहे. राज्याला केंद्र सरकारकडून 29 हजार कोटींचा जीएसटी परतावा येणे बाकी आहे. कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या.  शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे," असे राज्यपालांनी सांगितले.   
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com