पवार-शहा भेट राज्याच्या हिताची; पण शिवसेनेसाठी पोषक नाही

हे मला माहीत नाही.
Comment by Narayan Rane on the meeting between Sharad Pawar and Amit Shah
Comment by Narayan Rane on the meeting between Sharad Pawar and Amit Shah

मुंबई  ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली की नाही, हे मला माहीत नाही. पण, त्या दोघांची भेट झाली असेल तर राज्याच्या हिताची आहे. पण, ती शिवसेनेसाठी पोषक नाही, अशा सूचक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पवार-शहा भेटीवर भाष्य केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मधल्या काळात आले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. त्या भेटीबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व गोष्टी ह्या सार्वजनिक करायच्या नसतात, असे संदिग्ध उत्तर देत शहा यांनी आणखी गोंधळ वाढवला होता.

राष्ट्रवादीकडून या भेटीचा इन्कार करत भाजपकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. तसेच खासदार पटेल यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगून अशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मात्र वेगवेगळी वक्तव्ये करीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

त्याच भेटीसंदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी वरील भाष्य केले. दरम्यान, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर नारायण राणे हे तातडीने भेटण्यासाठी रुग्णालयातही गेले होते.

हेही वाचा  ः प्रशांत परिचारकांनी सांगितले समाधान आवताडेंना पाठिंबा देण्यामागचे कारण 
  
मंगळवेढा (जि. सोलापूर) : ‘‘विरोधी उमेदवाराच्या (राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार भारत भालके) विरोधात असणारी मते ही जवळपास दीड लाख आहेत. म्हणून, आम्ही  दोघे (प्रशांत पारिचारक आणि समाधान आवताडे) स्वतंत्र लढून मतविभागणी करण्यापेक्षा मी उभारलो, तर आवताडेंनी मला मदत करायची आणि आवताडे उभारले तर मी त्यांना मदत करायची, अशा भूमिकेतून आम्ही मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत,’’ अशा शब्दांत आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांना पाठिंबा देण्यामागची खेळी उघड केली. 

भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर पोटनिवडणुकीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आला. त्यावेळी आमदार परिचारक बोलत होते. 

यूपीए सरकारच्या काळात केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी साखरेची विक्री किंमत कधी 3100 रुपये ठरविली नाही. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर बोजा न पडता साखरेची विक्री किंमत 3100 रुपयांच्या खाली येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला, असेही आमदार परिचारक यांनी सांगितले.

आमदार परिचारक म्हणाले की, पूर्वीच्या काळी युरियासाठी दुकानासमोर रांगा लागायच्या. प्रसंगी पोलिस बंदोबस्त पाचारण करावा लागायचा; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गैरमार्गाने दारूधंद्यांकडे जाणारा एरिया बंद केल्यामुळे आज शेतकऱ्यांची युरियाबद्दलची कधीही तक्रार आपण ऐकली नाही. परदेशात फिरताना तिथले रस्ते पाहिल्यानंतर आपल्या देशात असे रस्ते कधी व्हायचे, असा प्रश्न निर्माण व्हायचा. पण, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व ठिकाणच्या रस्त्यासाठी तीन लाख कोटींची तरतूद करून रस्त्यांची निर्मिती केली, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील आपली जमीन महामार्गासाठी देण्याची भूमिका बजावली, त्यातून शेतकऱ्यांना योग्य मोबदलादेखील मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com