वृक्षलागवड प्रकरण - ठाकरेंची क्लीन चिट; भरणेंकडून मात्र चौकशीची घोषणा

भाजपचे सरकार असताना तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या वृक्षलागवड योजनेत कुठलाही गैरव्यवहार नाही, असा निर्वाळा एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात दिलेला असतानाच दुसरीकडे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मात्र या प्रकरणात विधीमंडळाची चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
Uddhav Thackeray- Sudhir Mungantiwar-Dattatray Bharne
Uddhav Thackeray- Sudhir Mungantiwar-Dattatray Bharne

मुंबई : भाजपचे सरकार असताना तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या वृक्षलागवड योजनेत कुठलाही गैरव्यवहार नाही, असा निर्वाळा एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात दिलेला असतानाच दुसरीकडे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मात्र या प्रकरणात विधीमंडळाची चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. 

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मागणी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री भरणे यांची विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची योजना सुरु केली होती. त्यावर काही आमदारांनी लेखी प्रश्न विचारला होता. या योजनेचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष वृक्षलागवड केली गेली नाही, असा आक्षेप घेत प्रश्न विचारला होता. त्यावर चौकशी समिती नेमली आहे काय व नेमली नसल्यास विलंबाची कारणे काय, असेही विचारण्यात आले होते. 

त्याला लेखी उत्तर देताना या योजनेवर २४२९.७८ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्या निधीचा पूर्ण वापर झाला असून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच आॅक्टोबर २०२० अखेर ७५.६३ टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. चौकशीच्या प्रश्नावर 'याबाबत प्रश्न उद्भवत नाही,' असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मागणी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री भरणे यांची विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी २०१४ ते २०१९ या कालावधीत २ हजार ४२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. वृक्ष लागवड हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून खरेदी केली गेली याची माहिती समोर आली पाहिजे, अशी नाना पटोले यांनी मागणी केली. ही चौकशी सहा महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज दिली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com