योगीजी मुंबईत आले आहेत की पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये : संजय राऊतांचा सवाल

योगीजी मुंबईत आले आहेत, की पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे भाजपच्या लोकांनी स्पष्ट केले पाहिजे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. तिला भाजपच्या लोकांनी समर्थन दिले होते, त्याचा संदर्भ घेऊन राऊत यांनी ही टीका केली आहे.
Yogi Adityanath Sanjay Raut
Yogi Adityanath Sanjay Raut

मुंबई : योगीजी मुंबईत आले आहेत, की पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे भाजपच्या लोकांनी स्पष्ट केले पाहिजे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. तिला भाजपच्या लोकांनी समर्थन दिले होते, त्याचा संदर्भ घेऊन राऊत यांनी ही टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत आहेत. या भेटीत ते उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करत आहेत. बाॅलीवूडच्या निर्मात्यांच्याही भेटी ते घेत आहेत. सकाळीच त्यांनी अभिनेता अक्षयकुमारची भेट घेतली. उत्तर प्रदेशात चित्रपट उद्योग सुरु करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न आहे. त्यावरून आता गदारोळ उठला आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "फिल्म सिटी वर मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. पण मुंबईच्या धर्तीवर जर कोणी विकास करत असेल, उत्तर प्रदेश सारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल, तिथे रोजगार निर्मिती होणार असेल, तर आम्ही स्वागत करतो. कारण त्यामुळे मुंबई वरचा ताण कमी होईल, त्यासंदर्भात जोगी ना मदत लागली तर आम्ही नक्की करु,"

राऊत पुढे म्हणाले, "संपूर्ण देशाचा विकास व्हावा आणि उत्तर प्रदेशचा सर्वात आधी व्हायला हवा. कारण संपूर्ण देशावर त्यांचा ताण आहे. तिथे मागासलेपण जास्त आहे.  याआधी देखील नोएडा येथे फिल्मसिटी उभी राहिली होती त्याचं काय झालं, तसा देखील पुनर्विकास त्यांनी करायला हवा,'' अनेक कलाकार जे जुहू बांद्रा पाली हिल तिथे राहतात तेदेखील उत्तर प्रदेश मध्ये शिफ्ट होणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. मुंबई देशाचे पोट भरते, शेवटी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री इथे यावे लागते, हा मुंबईचा गौरव आहे, असेही राऊत म्हणाले.

''उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे पक्षाला एक नवा चेहरा मिळाला, त्यांचा अभ्यास चांगला आहे, राज्यपाल राज्याच्या कॅबिनेटने केला प्रस्ताव मंजूर करावा लागेल, मला वाटत नाही राज्यपाल कोणते घटनेच्या विरोधात काम करतील. थोडा उशीर होईल कारण बारा नावांचा तो अभ्यास असतो, इतका महान अभ्यास असतो, त्यामुळे उशीर होईल पण नक्की सही करतील,'' असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तमिळनाडूत जाणार आहात का ? ती पण मोठी चित्रपटसृष्टी आहे. की त्यांचा पंगा फक्त मुंबईशी आहे ? अक्षय कुमार आंब्याची पेटी घेऊन गेले असतील ? असे सवाल करतानाच या पूर्वी अनेकांनी मुंबईला ओरबडून नेण्याचे प्रयत्न केले गेले अशी टीकाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com