राज्यपालांऐवजी राजभवनचे सचिव स्वीकारणार शेतकऱ्यांचे निवेदन

शेतकरी आंदोलन आज राजभवनावर धडकणार आहे. मात्र राज्यपाल आज गोव्यात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला सायंकाळी पाच वाजताची वेळ देण्यात आली असून राज्यपाल मात्र, सात वाजता मुंबईत पोहचणार आहेत.त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे निवेदन राजभवनावरील सचिवांना स्वीकारावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bhagatsingh Koshyare
Bhagatsingh Koshyare

मुंबई : शेतकरी आंदोलन आज राजभवनावर धडकणार आहे. मात्र राज्यपाल आज गोव्यात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला सायंकाळी पाच वाजताची वेळ देण्यात आली असून  राज्यपाल मात्र, सात वाजता मुंबईत पोहचणार आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे निवेदन राजभवनावरील सचिवांना स्वीकारावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत असे सांगण्यात आले होते. आझाद मैदानातून तीन वाजता लॉंग मार्च सुरू होणार आणि तो मेट्रो जवळ अडवला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ हे राजभवनावर जाईल, असेही कळविण्यात आले आहे. मात्र, स्वतः राज्यपालच गोव्यात असल्याने ते मोर्चाचे निवेदन स्वीकारू शकणार नाहीत, असे बोलले जात आहे.

दरम्यान, दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केले आहेत, त्यांना साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं शोषण करणारे कायदे केलेले आहेत. त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. देशातील शेतकरी त्रस्त झाला आहे. नागपूर येथे काँग्रेसने मोठे आंदोलन केले. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे करण्यात आले आहे. साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे. आतून पैसा उभा करून तो राजकारणासाठी वापरता येईल का,  असा विचार ते करीत असावे, त्यांचा निषेध आम्ही करतो. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com