मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र जयंत पाटील यांनी या वक्तव्याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसिद्ध केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
टि्वट करत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन एका पेपरमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये ही विनंती, असं त्यांनी म्हटलंय.
पाटील म्हणाले, ट्विट करून मी नेमकं काय म्हणालोय ते लोकांना सांगतो. मला वेगळा प्रश्न विचारला होता, मी त्यावर बोलताना म्हटलं होतं की "आमच्या पक्षाच संख्याबळ कमी आहे, मग मी मुख्यमंत्री होणार कसा? हा प्रश्न मी उपस्थित केला होता. पवार साहेब आमचं अंतिम निर्णय घेत असतात हे मी सांगितलं होतं, माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. का, असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल.
एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली होती.
तसेच मला मुख्यमंत्रीपदा पेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी केली यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलेल आहे. पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्या नंतर राजकीय वर्तुळात आता, चर्चा रंगू लागली आहे. की, शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद हे अडीच वर्षासाठी आहे, की पाच वर्षासाठी आहे. याचे स्पष्टीकरण येत नाही, तो पर्यंत उद्धव ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्नच आहे.
अजित पवार का म्हणाले?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, असी इच्छा व्यक्त केली. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जयंत पाटलांना माझा पाठींबा आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर आपल्याला काय वाटत? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, जयंत पाटील यांना माझा पाठींबा आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.