मुंबई : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज (ता. २२) वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, हमाल पंचायतीचे प्रमुख बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी होणार आहेत.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही शेतकऱ्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहे. हा मोर्चा रिलायन्सच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडकणार आहे. वांद्य्रातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.
''केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरीविरोधी तीनही कायद्यांचे बोलवते धनी अंबानी, अदानी आहेत. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी अदानी, अंबानींच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. याच धर्तीवर भविष्यात अंबानी, अदानी समूहाच्या सर्व सेवा आणि उत्पादने शेतकरी नाकारणार असून, देशाच्या खऱ्या मालकांना इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे,'' असे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाच्या नियोजनासाठी तयारी सुरू होती.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.