मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील व्हिसेरा तपासणीच्या अहवालाचे निष्कर्ष एम्सच्या तज्ज्ञांनी सीबीआयकडे सोपवले आहेत. सुशांतचा खून झाला नाही, असा एम्सचा निष्कर्ष असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
एम्सचा अहवाल आल्यानंतर भाजपचे तोंड काळे झाले आहे. भाजपने जो कट केला होता तो उघड झाला आहे. गुप्तेश्वर पांडेंना स्वेच्छानिवृत्ती उगाच नाही मिळाली. मुंबई पोलिसांना ज्या घाणेरड्या पद्धतीने बदनाम केले गेले, महाराष्ट्राचा अपमान केला गेला त्यातून महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही, असे सचिन सावंत यांनी ट्वीट करुन म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युचा राजकीय कारणांसाठी उपयोग करण्याचे पाप भाजपला महागात पडेल, असेही सावंत यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयने करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सुशांतच्या व्हिसेराचे नमुने एम्सकडे पाठवण्यात आले. एम्सच्या तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पथकाने या नमुन्यांची तपासणी करुन सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. त्याबाबतच्या वृत्तांच्या आधारे सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. "एका राजकीय कटाचा भाग म्हणून सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीन संस्थांना मुंबईत आणण्यात आले. सीआरपीसी आणि संघराज्य पद्धती धुडकावण्यात आली. राजकीय कारणांसाठी बिहार पोलिसांचा वापर केला गेला. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आले. आम्ही मोदी पुरस्कृत गोदी मिडीया ट्रायलचा निषेध करतो,'' असे सावंत यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.