मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा, सरकारचा संतापजनक कार्यक्रम...

मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा महाविकास आघाडी सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar

मुंबई : जळगावच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना पोलिसांनीच कपडे काढून नाचायला लावल्याचे उघड झाल्याने, मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा महाविकास आघाडी सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

नुकत्याच उघड झालेल्या या प्रकाराबाबत गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. पण त्याखेरीज सारेकाही शांत असून मुख्यमंत्र्यांच्या तर नाकावरील माशीदेखील हलली नसल्याचे चित्र आहे. असहाय महिलांचा अशा प्रकारे गैरफायदा घेणाऱ्या या हैवानांना तत्काळ पोलिस कोठडीत घेणे गरजेचे आहे. मात्र मंत्र्यांना वाचवा अन बाईला नाचवा हेच या सरकारचे अधिकृत धोरण झाले असल्याने, त्यांच्याकडून फारशी अपेक्षाही करता येत नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.  

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. त्याबाबत सरकारने लाजलज्जाही कोळून प्यायल्याचे दिसत आहे. तीन पक्षांमधील गावावरून ओवाळून टाकलेले गुंड एकत्र आल्यावर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहणार, असा प्रश्न विचारून भातखळकर पुढे म्हणतात की, एक मंत्री महिलेची फसवणुक करतो, दुसरा मंत्री आपल्या दुसऱ्या बायकोबाबत जनतेची फसवणुक करतो, असे प्रकार सुरु आहेत. सरकारच मंत्र्यांना वाचवते असे दिसल्याने गुंडांबरोबरच आता पोलिसही महिलांवर अत्याचार करू लागले आहेत. कोणालाही कोणाचाही धाक उरला नसल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे. तरच महिला राज्यात निर्धास्तपणे वावरू शकतील, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे सरकार आणखी किती खालच्या पातळीवर जाणार याची कल्पना फक्त त्यांनीच करावी. मात्र शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातल्या आयाबहिणींच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व ते मार्ग वापरू, असेही भातखळकर म्हणाले. एरवी उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांच्या मोठमोठ्या महिला नेत्या महाराष्ट्रात निषेध नोंदवण्याची नाटके करतात. मात्र आपल्याच राज्यातील माताभगिनींविषयी त्यांना थोडातरी कळवळा असेल किंवा या घटनांबाबत थोडीतरी लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्याच सरकारला जळगावच्या घटनेबाबत कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com